AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुन्नाभाईच्या ‘सर्किट’ने तिसऱ्यांदा केलं लग्न; 25 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

अभिनेता अर्शद वारसीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. लग्नाच्या 25 वर्षांनंतर त्याने मोठा निर्णय घेतला आहे. अर्शदने तिसऱ्यांदा लग्न केलं असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचा खुलासा केला आहे.

मुन्नाभाईच्या 'सर्किट'ने तिसऱ्यांदा केलं लग्न; 25 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय
Arshad WarsiImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2024 | 12:57 PM
Share

मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांमध्ये सर्किटची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अर्शद वारसी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अर्शदने नुकताच कोर्ट मॅरेज (नोंदणी पद्धतीने विवाह) केला आहे. पत्नी मारिया गोरेटीसोबत त्याने स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत पुन्हा एकदा लग्न केलं आहे. अर्शदने लग्नाच्या 25 वर्षांनंतर पुन्हा अशा पद्धतीने लग्न का केलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यामागचं कारण त्याने स्पष्ट केलं आहे. गेल्या 25 वर्षांत अर्शद आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या लग्नाला रजिस्टर्डच केलं नव्हतं.

अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी यांचा येत्या 14 फेब्रुवारी रोजी लग्नाचा 25 वा वाढदिवस आहे. या दोघांचं लग्न 14 फेब्रुवारी 1999 रोजी झालं होतं. त्यामुळे येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला अर्शद आणि मारिया हे वेडिंग अॅनिव्हर्सरीची सिल्वर जुबली सेलिब्रेट करणार आहेत. लग्नाला इतकी वर्षे झाल्यानंतरही या दोघांनी आपल्या लग्नाची नोंदणीच केली नव्हती. त्यामुळे 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी रजिस्टर्ड मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच त्यांनी 23 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने पुन्हा एकदा लग्न केलंय.

View this post on Instagram

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

याविषयी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्शद म्हणाला, “लग्नाची नोंदणी करण्याचा विचार कधीच आमच्या डोक्यात आला नव्हता आणि ते गरजेचं आहे असंही आम्हाला कधी वाटलं नव्हतं. मात्र प्रॉपर्टीच्या विषयात आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर लग्नाची नोंदणी असणं गरजेचं असतं हे आम्हाला समजलं. म्हणूनच कायद्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. अन्यथा एक जोडीदार म्हणून आम्ही एकमेकांना कमिटेड आहोत, एवढंच आमच्यासाठी पुरेसं होतं.”

कोर्ट मॅरेजबद्दल बोलताना मारियाने सांगितलं की, “गेल्या काही काळापासून ती नोंदणी करण्याचा विचार करत होती. अखेर 25 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ते शक्य झालं. मी एकाच व्यक्तीशी तिसऱ्यांदा लग्न करतेय.” यावेळी अर्शदने ‘व्हॅलेंटाइन डे’लाच लग्न करण्यामागचा किस्सा सांगितला. “मारियाच्या आईवडिलांनी आम्हाला लवकरात लवकर लग्न करायला सांगितलं होतं. आम्ही लेंटदरम्यान (मारियाचं एक प्रकारचं व्रत) लग्न करू शकलो नाही. त्यानंतर कामात व्यग्र झालो. अखेर वर्ष बर्बाद न करता त्यावेळी जी तारीख योग्य वाटली होती ती म्हणजे 14 फेब्रुवारी. म्हणून त्याच दिवशी आम्ही लग्न केलं. आता माझ्याकडे व्हॅलेंटाइन डेची सर्वांत भयानक आठवण आहे, ती म्हणजे त्याचदिवशी मी लग्न केलं”, अशी मस्करी अर्शदने यावेळी केली.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.