AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहानपणी मुलांचे कान का टोचले जातात? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण

मुलांचे कान टोचल्याने केवळ सौंदर्य वाढत नाही, तर बुद्धिमत्ता, दृष्टी आणि पचनशक्तीवरही सकारात्मक परिणाम होतो. भारतीय परंपरेतील 'कर्णवेध' संस्कारामागील वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणे या बातमीतून सविस्तर जाणून घ्या.

लहानपणी मुलांचे कान का टोचले जातात? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
फोटो क्रेडीट - Pisit Rapitpunt/Moment/Getty Images
| Updated on: Feb 17, 2026 | 3:19 PM
Share

भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी सोळा संस्कार सांगितले आहेत. यातील प्रत्येक संस्कारामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे सखोल वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन दडलेला आहे. यापैकीच एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे कर्णवेध मुलांचे कान टोचणे. आजच्या आधुनिक काळात अनेक पालकांना ही केवळ एक परंपरा किंवा दागिने घालण्याची पद्धत वाटते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्र आणि ॲक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार, लहानपणी कान टोचणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते.

कर्णवेध संस्कारामागील विज्ञान काय?

तज्ज्ञांच्या मते, मानवी कानाच्या पाळीवर (Ear Lobe) असे काही विशिष्ट सूक्ष्म बिंदू असतात, ज्यांचा थेट संबंध मेंदूच्या नसांशी आणि शरीरातील महत्त्वाच्या इंद्रियांशी असतो. जेव्हा कान टोचले जातात, तेव्हा हे बिंदू सक्रिय होतात. यालाच आधुनिक भाषेत ॲक्युपंक्चर किंवा ॲक्युप्रेशर असेही म्हटले जाते.

कान टोचण्याचे आश्चर्यकारक फायदे

  • कानाच्या पाळीच्या मध्यभागी असा एक बिंदू असतो, जो मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला जोडणाऱ्या नसांना उत्तेजित करतो. यामुळे मुलांची स्मरणशक्ती (Memory) तल्लख होते आणि अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होते.
  • ॲक्युप्रेशर शास्त्रानुसार, कानाच्या ज्या भागावर छिद्र पाडले जाते, त्याचा संबंध डोळ्यांच्या नसांशी असतो. यामुळे दृष्टी दोष कमी होण्यास मदत होते. तसेच, यामुळे कानाच्या आतील नसा सक्रिय होऊन ऐकण्याची क्षमता (Hearing Power) अधिक तीव्र होते.
  • कानाच्या पाळीवर ‘हंगर पॉईंट’ (Hunger Point) असतो. कान टोचल्यामुळे पचनक्रियेशी संबंधित केंद्र उत्तेजित होतात. यामुळे मुलांची भूक सुधारते, पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच भविष्यात लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
  • ज्या मुलांचे लहानपणी कान टोचले जातात, त्यांच्यामध्ये हिस्टेरिया किंवा मानसिक अस्वस्थतेसारखे आजार होण्याची शक्यता कमी असते. यामुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होऊन ते अधिक शांत आणि स्थिर राहतात.
  • आयुर्वेदानुसार, कान टोचण्याचा संबंध प्रजनन अवयवांच्या आरोग्याशीही असतो. पुरुषांच्या बाबतीत हे वीर्य संरक्षणास मदत करते, तर स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास साहाय्यक ठरते.

योग्य वेळ कोणती?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलांचे कान टोचण्यासाठी ३ ते ५ वर्षे हे वय सर्वात योग्य आहे. या वयात मुलांची त्वचा मऊ असते. त्यामुळे वेदना कमी होतात आणि जखम लवकर भरून येते. तसेच, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही यामुळे मदत होते.

(डिस्क्लेमर : या लेखामध्ये दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि पारंपारिक/धार्मिक समजुतींवर आधारित आहे. याला पूर्णपणे वैद्यकीय सल्ला समजू नये.)

पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर अंजली दमानियांचे गंभीर प्रश्न
पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर अंजली दमानियांचे गंभीर प्रश्न.
रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया.
आमच्याकडे अनेक पुरावे, उद्या गौप्यस्फोट करणार; रोहित पवारांची माहिती
आमच्याकडे अनेक पुरावे, उद्या गौप्यस्फोट करणार; रोहित पवारांची माहिती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी?.
दादांचे निर्णय, स्वप्ने, दादांसोबतच गेले, माझा भाऊच राहिला नाही....
दादांचे निर्णय, स्वप्ने, दादांसोबतच गेले, माझा भाऊच राहिला नाही.....
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्वीकृत नगरसेवक करायचे आहे काय?
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्वीकृत नगरसेवक करायचे आहे काय?.
दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले! आता काय उरलं? - सुप्रिया सुळे
दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले! आता काय उरलं? - सुप्रिया सुळे.
मेधा सोमय्यांचा संजय राऊतांवर अब्रूनुकसानीचा दावा
मेधा सोमय्यांचा संजय राऊतांवर अब्रूनुकसानीचा दावा.
मुंलुंडची घटना अपघात नाही खून; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत
मुंलुंडची घटना अपघात नाही खून; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत.
'त्या' फाईलमुळे अजित पवार आणि भाजपात वाद! राऊतांनी सगळंच सांगितलं
'त्या' फाईलमुळे अजित पवार आणि भाजपात वाद! राऊतांनी सगळंच सांगितलं.