Team India T20i Captain : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर हाच कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार का? जाणून घ्या 3 कारण
India vs Afghanistan : श्रेयस अय्यर हा टी 20i टीम इंडियाचा कॅप्टन होणार असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात पाहायला मिळत आहे. मात्र इतर खेळाडू असताना श्रेयसच कसा सरस ठरत आहे? जाणून घ्या.

Team India Shreyas IyerImage Credit source: PTI
टीम इंडियात बदलाचे वारे पाहायला मिळत आहेत. बीसीसीआय निवड समिती टी 20i टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिलक वर्मा हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. मात्र श्रेयस हा टी 20i संघाच्या कर्णधारपदासाठी तगडा दावेदार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय येत्या काही दिवसांत श्रेयसच्या नावाची घोषणा करु शकते. मात्र श्रेयस तगडा दावेदार असण्याचं कारण काय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
Follow Us
