AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Vidyarthi | ‘दुःखी होवून आता मी स्वतःला संपवू….’, दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांच्यावर का आली अशी वेळ?

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची झाली अशी अवस्था? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याचीच चर्चा...

Ashish Vidyarthi | 'दुःखी होवून आता मी स्वतःला संपवू....', दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांच्यावर का आली अशी वेळ?
| Updated on: Jun 06, 2023 | 12:34 PM
Share

मुंबई : अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंग आहे. दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांच्यावर अशी वेळ आली, ज्यामुळे अभिनेत्या ‘दुःखी होवून आता मी स्वतःला संपवू….’ असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्या पत्नीसोबत संसार थाटल्यामुळे अनेकांनी आशिष विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या, तर काही नेटकऱ्यांनी मात्र अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. दुसऱ्या लग्नामुळे आशिष विद्यार्थी यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे आशिष विद्यार्थी आणि दुसरी पत्नी रुपाली बरुआ यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या लग्नानंतर भूमिका स्पष्ट केली आहे. आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘दुसऱ्या लग्नानंतर अनेकांनी माझ्यासाठी अपमानजनक शब्दांचा प्रयोग करत मला ट्रोल केलं. माझ्या वयाबद्दल अनेक गोष्टी मी ऐकल्या. मला कळत नाही इतक्या खालच्या शब्दांचा प्रयोग कोण करु शकतं…’

‘प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यात वृद्ध होणार आहे. मी दुसरं लग्न केलं, त्यात मी काय वाईट केलं. मी एक जबाबदार नागरीक आहे. मी टॅक्स भरतो, प्रत्येक गोष्टीचं बिल भरतो… मी भारतीय नागरिक आहे, तर मला माझ्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार नाही. मी माझ्या आयुष्यावर प्रेम करतो. ट्रोलिंगमुळे माझी पत्नी देखील कंटाळली आहे. ज्यांचं वय वाढत आहे, त्यांनी दुःखी होवून स्वतःला संपवायला हवं का? आयुष्यात कोणाची साथ हवी असेल तर, लग्न का करु नये?’ असं देखील अभिनेते आशिष विद्यार्थी म्हणाले…

आशिष विद्यार्थी पुढे म्हणाले, ‘व्यक्ती म्हणून आपण एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवा. आता जे काही होत आहे, त्याची मी अपेक्षा देखील केली नव्हती. जर एखादा व्यक्ती वृद्ध होत असेल तर त्याचा सांभाळ कोण करेल, जे ट्रोल करत आहेत, ते करतील का? आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार सर्वांना आहे. मला माझ्या आयुष्यात आनंद हवा आहे…’ असं देखील ट्रोल करणाऱ्यांना खडसावत आशिष विद्यार्थी म्हणाले.

बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. रुपाली हिचं देखील आशिष यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. रुपाली हिला एक मुलगी असून तिच्या पहिल्या पतीचं निधन झालं आहे. कोलकाता याठिकाणी ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत आशिष विद्यार्थी यांनी लग्न केलं.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.