AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 वर्षांच्या संसारानंतर ‘अंगुरी भाभी’चा घटस्फोट; दुसऱ्या लग्नाविषयी शुभांगी अत्रे म्हणाली…

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने 2003 मध्ये पियुष पूरेशी इंदूरमध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून शुभांगी आणि पियुष वेगवेगळे राहत होते. आता घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाविषयी काय विचार आहे, याबद्दल शुभांगी व्यक्त झाली.

19 वर्षांच्या संसारानंतर 'अंगुरी भाभी'चा घटस्फोट; दुसऱ्या लग्नाविषयी शुभांगी अत्रे म्हणाली...
Shubhangi AtreImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 14, 2023 | 3:36 PM
Share

मुंबई : 14 डिसेंबर 2023 | ‘भाभीजी घर पर है’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र अंगुरी भाभी ही भूमिका विशेष गाजली. मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात लोकप्रिय झाली. तिने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेत सर्वांना हसवणारी शुभांगी तिच्या खासगी आयुष्यात मात्र एकटी आहे. 42 वर्षीय शुभांगी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीसोबत तुटलेल्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

शुभांगी अत्रेने कमी वयातच लग्न केलं होतं. वयाच्या 20 व्या वर्षी तिने पियुष पुरेशी लग्न केलं आणि आता लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. शुभांगीने घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. हा संपूर्ण काळ भावनिकदृष्ट्या अनेक चढउतारांचा होता, असं शुभांगी म्हणाली. वैवाहिक आयुष्यातील समस्यांना सामोरं गेल्यानंतर पुन्हा कधी कोणावर प्रेम करू शकेन असं मला वाटत नाही, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

“माझ्याने आता पुन्हा प्रेम होणारच नाही. प्रेमाच्या कोणत्याही नात्यासाठी मी माझ्या आयुष्यातील सर्व मार्ग बंद केले आहेत. माझं लग्न कमी वयात झाल्याने मी आईसुद्धा लवकर झाले होते. आता माझी मुलगी 18 वर्षांची असून ती अमेरिकेत शिक्षण घेत आहे. माझी मुलगीच माझी सर्वांत चांगली मैत्रीण आहे. तिच्याकडून मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात”, असं शुभांगीने सांगितलं.

“जवळपास वर्षभरापासून आम्ही एकत्र राहत नाही. आमचा संसार वाचवण्यासाठी पियुष आणि मी खूप प्रयत्न केले. एकमेकांचा आदर, साथ, विश्वास आणि मैत्री हे मजबूत लग्नाचा पाया असतात. मात्र जसजशी वेळ पुढे निघून गेली, तसतसं आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांमधील वाद मिटवू शकत नाही आहोत. म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला”, असं शुभांगी म्हणाली.

शुभांगीने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. या मालिकेत तिने पलचीन बासूची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘कस्तुरी’ आणि ‘दो हंसो का जोडा’ यांसारख्या मालिकेत काम केलं होतं. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे शुभांगीला आणखी लोकप्रियता मिळाली.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.