AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Jadhav | भरत जाधव मुंबई सोडून कोल्हापुरात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं कारण

भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेत त्याने काम केलं. याशिवाय नाटकानिमित्त त्याचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दौरे होत असतात.

Bharat Jadhav | भरत जाधव मुंबई सोडून कोल्हापुरात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं कारण
Bharat JadhavImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2023 | 2:50 PM
Share

मुंबई : अभिनेता भरत जाधवने मुंबई सोडून कोल्हापूरला राहायला जाण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला. भरत हा मूळचा कोल्हापूरचाच असून काही महिन्यांपूर्वी तो तिथे कुटुंबीयांसोबत राहायला गेला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर अचानक मुंबई का सोडली आणि कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला, याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला.

मुंबई सोडण्याविषयी भरत म्हणाला, “मी आता मुंबई शहराकडे एक बिझनेस हब म्हणून पाहू लागलोय. हे शहर आता बिझनेस हब बनलं आहे. मी या दृष्टीने विचार यासाठी करत आहे कारण मला सध्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता हवी आहे. कोल्हापूरमध्ये माझं घर आहे आणि माझे कुटुंबीयसुद्धा इथेच माझ्यासोबत राहतात. कामाच्या निमित्ताने मी मुंबईत ये-जा करत राहीन. मी मुंबईतलं माझं घर विकलेलं नाही. त्यामुळे जेव्हा कधी शूट किंवा इतर काही काम असेल तेव्हा मी मुंबईत येईन.”

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “माझ्या मते सध्याच्या आयुष्यात श्वास घेण्यासाठी मोकळा क्षण खूप आवश्यक आहे. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी मिळून कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. मला इथे राहायला आवडतं. इथली हवा ताजी आहे. मला मुंबईसुद्धा आवडते, पण आता तिथूनच काम केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. सध्या मी फक्त कामानिमित्त मुंबईला येतो आणि काम झाल्यावर पुन्हा कोल्हापूरला येतो.”

भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत त्याने काम केलं. याशिवाय नाटकानिमित्त त्याचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दौरे होत असतात.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ