AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Jadhav | भरत जाधव मुंबई सोडून कोल्हापुरात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं कारण

भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेत त्याने काम केलं. याशिवाय नाटकानिमित्त त्याचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दौरे होत असतात.

Bharat Jadhav | भरत जाधव मुंबई सोडून कोल्हापुरात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं कारण
Bharat JadhavImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2023 | 2:50 PM
Share

मुंबई : अभिनेता भरत जाधवने मुंबई सोडून कोल्हापूरला राहायला जाण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला. भरत हा मूळचा कोल्हापूरचाच असून काही महिन्यांपूर्वी तो तिथे कुटुंबीयांसोबत राहायला गेला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर अचानक मुंबई का सोडली आणि कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला, याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला.

मुंबई सोडण्याविषयी भरत म्हणाला, “मी आता मुंबई शहराकडे एक बिझनेस हब म्हणून पाहू लागलोय. हे शहर आता बिझनेस हब बनलं आहे. मी या दृष्टीने विचार यासाठी करत आहे कारण मला सध्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता हवी आहे. कोल्हापूरमध्ये माझं घर आहे आणि माझे कुटुंबीयसुद्धा इथेच माझ्यासोबत राहतात. कामाच्या निमित्ताने मी मुंबईत ये-जा करत राहीन. मी मुंबईतलं माझं घर विकलेलं नाही. त्यामुळे जेव्हा कधी शूट किंवा इतर काही काम असेल तेव्हा मी मुंबईत येईन.”

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “माझ्या मते सध्याच्या आयुष्यात श्वास घेण्यासाठी मोकळा क्षण खूप आवश्यक आहे. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी मिळून कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. मला इथे राहायला आवडतं. इथली हवा ताजी आहे. मला मुंबईसुद्धा आवडते, पण आता तिथूनच काम केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. सध्या मी फक्त कामानिमित्त मुंबईला येतो आणि काम झाल्यावर पुन्हा कोल्हापूरला येतो.”

भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत त्याने काम केलं. याशिवाय नाटकानिमित्त त्याचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दौरे होत असतात.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....