AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अपहरण केलं, नालासोपाऱ्यात नेलं आणि…’, ‘बिग बॉस 17’ फेम खानजादी हिचा गौप्यस्फोट

Bigg Boss 17 | मुंबईत आल्यानंतर 'बिग बॉस 17' फेम खानजादी हिच्यावर आलेला 'तो' वाईट प्रसंग... तिचं अपहरण केलं आणि..., काळीज पिळवटून टाकणारी घटना..., खुद्द खानजादी हिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा केलाय खुलासा.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खानजादी हिची चर्चा...

'अपहरण केलं, नालासोपाऱ्यात नेलं आणि...', 'बिग बॉस 17' फेम खानजादी हिचा गौप्यस्फोट
| Updated on: Mar 30, 2024 | 10:00 AM
Share

प्रसिद्ध आणि लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस 17’ तुफान चर्चेत राहिला. शो आता संपला आहे, पण तरी देखील शोमधील स्पर्धक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरात फिरोझा खान म्हणजे खानजादी हिने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बिग बॉसच्या घरात खानजादी हिची अभिनेता अभिषेक कुमार याच्यासोबत असलेली केमिस्ट्री प्रत्येकाला आवडली. पण खानजादी बिग बॉसच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नाही… पण आता खानजादी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खानजादी हिने तिच्यासोबत घडलेल्या अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी खानजादी मायानगरीत आली. पण मुंबईत आल्यानंतर अभिनेत्री कशी वागणूक मिळाली याबद्दल अभिनेत्रीने मोठा आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगितली आहे.

खानजादी म्हणाली, ‘मुंबईत आल्यानंतर आयुष्य बदलणार माहिती होतं. अनेकांनी मला सांगितलं होतं अनेक प्रवृत्तीची माणसं भेटतील. तुला भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तसंच झालं… माझं अपहरण झालं… नालासोपारा येथील झोपडपट्टीत मला घेऊन गेले. त्यांनी मला जीवेमारण्याचा प्रयत्न केला. पण मी तेथून पळ काढला… मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही..’

‘अनेक वाईट गोष्टी घडल्या… पण मी माझी जिद्द सोडली नाही. मी मुंबई सोडून जाणार नाही… याच एका गोष्टीवर मी ठाम होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझा आनंद, कुटुंब, भावना सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे. मी मुंबईत आली आहे कही तरी करुन दाखवण्यासाठी…’

पुढे खानजादी म्हणाली, ‘झगमगत्या विश्वात करियर करण्यासाठी अनेक तरुण, तरुणी घर सोडण्याचा निर्णय घेतात. पण मी त्यांना सांगेल इतकं मोठं पाऊन उचलू नका…कारण प्रवास फार कठीण आहे. प्रत्येक जण कंगना रनौत आणि खानजादी नसतो… कंगना हिने फार कमी वयात घर सोडलं… मी देखील घर सोडून आली आहे.’ असं देखील खानजादी म्हणाली.

एवढंच नाहीतर, खानजादी हिने झगमगत्या विश्वात कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे. खानजादी म्हणाली, ‘कास्टिंग काऊच सारख्या वाईट गोष्टीचा देखील सामना केला आहे. पण मला समजून यायचं समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे… मी छोट्या शहरातून आली आहे. पण मी मुर्ख नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खानजादी हिची चर्चा रंगली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.