AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18: ‘मला नाती जपता आली नाही आणि…’, भावना व्यक्त करताना करणवीरच्या डोळ्यात पाणी

Bigg Boss 18: दोन घटस्फोटांनंतर करणवीर भावूक, बिग बॉसच्या घरात भावना व्यक्त करत म्हणाला, 'मला नाती जपता आली नाही आणि...', करणवीर 'बिग बॉस'च्या घरातील दमदार स्पर्धक आहे... सध्या सर्वत्र करणवीर याची चर्चा...

Bigg Boss 18: 'मला नाती जपता आली नाही आणि...', भावना व्यक्त करताना करणवीरच्या डोळ्यात पाणी
| Updated on: Oct 26, 2024 | 8:49 AM
Share

Bigg Boss 18: टीव्हीवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस 18’ च्या घरात दमदार ड्रामा सुरु आहे. स्पर्धक एकमेंकावर अनेक आरोप करताना दिसत आहे. टास्क सुरु असताना स्पर्धकांचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे खासगी आयुष्याबद्दल सांगताना स्पर्धक भावूक होताना देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची चर्चा रंगली आहे. नुकताच करणवीर याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. खासगी आयुष्याचा खुलासा करताना करणवीर याच्या डोळ्यात पाणी देखील आलं.

बिग बॉस 18 चा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये करणवीर, श्रृतीका हिच्यासोबत बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या झालेल्या मैत्रीचं उदाहरण देत म्हणाला, ‘एका कुटुंबाला एक जोडून ठेवू शकतो… एवढी क्षमता माझ्यामध्ये नाही… हे सत्य मला आता कळलं आहे. मला असं वाटलं येथे देखील माझं कुटुंब झालं आहे. (चूम, शिल्पा, श्रुतिका) हे माझ्यासोबत घरात आणि बाहेर देखील राहतील असं मला वाटलं. पण मी कुटुंबाला सांभाळू शकलो नाही….’ भावना व्यक्त करताना करणवीर याच्या डोळ्यातून पाणी आलं.

करणवीर याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचे दोन लग्न झाली आहेत. पण त्याचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत. ‘बिग बॉस’च्या घरात करणवीर अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला. प्रसिद्धी झोतात आल्यापासून त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

करणवीर याचं पहिलं लग्न

करणवीर याचं पहिलं लग्न 2009 मध्ये मैत्रिण देविका हिच्यासोबत झालं होतं. देविका हिला 10 वर्ष डेट केल्यानंतर करणवीर याने लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये करणवीर आणि देविका यांचा घटस्फोट झाला.

करणवीर यांचं दुसरं लग्न

पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर करणवीर याने 2021 मध्ये दुसरं लग्न अभिनेत्री निधी सेठ हिच्यासोबत केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. निधी हिने करणवीर मेहरा सोबत लग्न करणं चुकीचा निर्णय होता… असं सांगितलं. अशात दोघांचे 2023 मध्ये मार्ग वेगळे झाले.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.