AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षा उसगांवकर यांनी केला अखेर ‘त्या’ गोष्टीवर मोठा खुलासा, ढसाढसा रडत म्हणाल्या, त्यावेळी माझ्यासाठी…

वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर आहे. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.

वर्षा उसगांवकर यांनी केला अखेर 'त्या' गोष्टीवर मोठा खुलासा, ढसाढसा रडत म्हणाल्या, त्यावेळी माझ्यासाठी...
Varsha Usgaonkar
| Updated on: Aug 24, 2024 | 3:33 PM
Share

अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळतानाही वर्षा उसगांवकर या दिसत आहेत. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला असून अनेक हीट चित्रपट त्यांनी दिले आहेत. वर्षा उसगांवकर यांनी महाभारत मालिकेतही महत्वाची भूमिका केली. सध्या बिग बॉस मराठी सीजन 5 मधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर यांचे आहे. सुरूवातीला बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. निकी तांबोळी आणि त्यांच्यामध्ये जोरदार वाद देखील बिग बॉसच्या घरात झाल्याचे बघायला मिळाले.

आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरात एकटी शांत बसली होती. यावेळी वर्षा उसगांवकर या तिच्याजवळ जातात आणि असे एकटे शांत बसण्याचे कारण विचारतात. यावेळी आर्या ही आपल्याला बिग बॉसच्या घरात राहायचे नसून बाहेर जायचे सांगताना दिसली. हेच नाही तर आपल्याला घरातील लोकांनी वाळित टाकल्याचेही तिने सांगितले.

यावेळी वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, मी ज्यावेळी कॉलेजमध्ये गेले, त्यावेळी काही मुलींनी मलाही असेच वाळीत टाकले होते. मी कोणालाही बोलत नव्हते. हेच नाही तर मला काहीही बोलायचे म्हटले की, मी घाबरत. त्यानंतर मी बंडखोरी केली…मला माहिती आहे की, आपल्याला कोणी वाळीत टाकले की, कसे होते.

हे म्हणत वर्षा उसगांवकर या चक्क रडताना दिसल्या. आर्या हिला गळ्याला लावत ढसाढसा रडताताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. कॉलेजमधील जुने दिवस आठवत वर्षा उसगांवकर रडल्या. त्यावेळी आपल्यासोबत काय व्हायचे हे देखील वर्षा उसगांवकर यांनी सांगितले. आता वर्षा उसगांवकर यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात कायमच सर्वांना समजून सांगताना दिसतात. हेच नाही तर निकी तांबोळी आणि अरबाज खान यांच्यामध्ये सुरू असलेला वाद देखील थांबवताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. यावेळी वर्षा उसगांवकर यांनी निकी तांबोळी हिला काही गोष्टी समजून सांगितल्या. सुरूवातीच्या काळात वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात जोरदार वाद बघायला मिळाला होता.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत