AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elvish Yadav | अर्जुन बिजलानीवरील ‘त्या’ कमेंटमुळे बिग बॉस विजेता एल्विश यादव तुफान ट्रोल

विजेतेपद पटकावून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून प्रसिद्ध युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर एल्विश यादव सतत चर्चेत आहे. नुकतीच त्याने अभिनेता अर्जुन बिजलानीवर एक कमेंट केली. या कमेंटमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

Elvish Yadav | अर्जुन बिजलानीवरील 'त्या' कमेंटमुळे बिग बॉस विजेता एल्विश यादव तुफान ट्रोल
Elvish Yadav and Arjun BijlaniImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव सध्या त्याच्या म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘हम तो दिवाने’ हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. यामध्ये तो अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय तो लवकरच अभिनेत्री ईशा गुप्तासोबत आणखी एका गाण्यात झळकणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून एल्विशला बरेच ऑफर्स मिळत आहेत. अशातच तो अभिनेता अर्जुन बिजलानीच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यामुळेही चर्चेत आला आहे. या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. विशेष म्हणजे हे प्रकरण ‘बिग बॉस ओटीटी 2’ची माजी स्पर्धक जिया शंकरशी संबंधित आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जिया शंकरने नुकतीच एक पोस्ट लिहिली होती. ‘लोक वेड्यासारखे सोशल मीडियावर भांडत आहेत. कठीण काळातही माझ्या चेहऱ्यावर हास्य असतं, कारण तो माझा मूळ स्वभाव आहे. मात्र काही लोकांना फक्त टोमणे मारायला आवडतं. मी हे अनेकदा बोलली आणि आता पुन्हा एकदा बोलते की अभिषेक मल्हानच बिग बॉसचा विजेता बनण्यालायक होता. इतर लोकांना जे करायचं असेल ते करू द्या’, असं तिने लिहिलं होतं. जिया आणि अभिषेकची मैत्री ही बिग बॉस सुरू झाल्यापासूनच चांगली होती. मात्र काही लोकांना तिची ही पोस्ट आवडली नाही. जियाच्या याच पोस्टवर अर्जुन बिजलानीने ट्विट केलं होतं. हा ट्विट चांगलाच व्हायरल झाला होता.

एल्विश यादव ट्रोल

‘बिग बॉसमध्ये जाऊन आल्यापासून काही लोक आणि त्यांचे फॅन क्लब्स ही गोष्ट विसरले आहेत की महिलांचा आदर कसा केला पाहिजे. दु:खद’, अशा शब्दांत अर्जुनने नाराजी व्यक्त केली. त्यावर एल्विशने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘मला आता समजलं की तू महिला आहेस.’ एल्विशच्या या कमेंटनंतर अर्जुनच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. ‘असे लोक बिग बॉसचे विजेते आणि आजच्या काळातील इन्फ्लुएन्सर आहेत, हे पाहून आणखी वाईट वाटतं’, असं एकाने लिहिलं. तर बिग बॉसनंतर एल्विशचा अहंकार आणखी वाढला आहे, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

‘बिग बॉस ओटीटी 2’च्या दुसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचाच दबदबा पाहायला मिळाला. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने या सिझनचं विजेतेपद आपल्या नावे केलं. ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा रिॲलिटी शो जिंकल्यापासून एल्विशच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. म्युझिक व्हिडिओपासून ते चित्रपटांपर्यंत त्याला असंख्य ऑफर्स येत आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...