AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, ऐश्वर्या रायची लव्ह स्टोरी…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्ह स्टोरी चाहत्यांना प्रचंड आवडते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकन बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, ऐश्वर्या रायची लव्ह स्टोरी...
aishwarya rai and abhishek bachchan
| Updated on: Jul 01, 2024 | 11:20 AM
Share

ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. ऐश्वर्या रायची मोठी संपत्ती देखील आहे. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. आता या दोघांना एक मुलगी आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या लग्नाला 17 वर्षे देखील पूर्ण झाली आहेत.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले. एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना दिसला. यावेळी त्याने मैत्रीचे रूपांतर प्रेमात नेमके कसे झाले हे थेट पणे सांगितले.

अभिषेक बच्चन हा म्हणाला की, मी माझ्या करिअरच्या सुरूवातींच्या चित्रपटामध्ये ऐश्वर्यासोबत काम केले. मी आणि ऐश्वर्याने सर्वात अगोदर ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटात काम केले. आम्ही चांगले मित्र होतो. त्यानंतर आम्ही अजून एक चित्रपट ‘कुछ ना कहो’मध्येही काम करणार होतो. त्यावेळी आमच्यामध्ये एक खूप चांगली मैत्री नक्कीच होती.

वेळेनुसार आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 2006 मध्ये उमराव जान चित्रपटाच्या वेळी मी ऐश्वर्या राय हिच्या प्रेमात पडलो, थेट अभिषेक बच्चन हा आपली लव्ह स्टोरी सांगताना दिसला. रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन याने 2006 मध्ये ऐश्वर्या राय हिला लग्नासाठी प्रपोज केला आणि 2007 मध्ये यांनी लग्न देखील केले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसतंय की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्यामध्ये वाद सुरू आहेत आणि हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....