AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर बच्चन कुटुंबियांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, थेट खुलासा, अमिताभ यांनाच..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan Marriage : ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या रायची कोट्यवधीची संपत्ती देखील आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याचे काही दिवसांपासून सतत सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर बच्चन कुटुंबियांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, थेट खुलासा, अमिताभ यांनाच..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Jun 10, 2024 | 10:59 AM
Share

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले. हे लग्न अत्यंत खास पद्धतीने पार पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लेकाच्या लग्नाची जोरदार तयारी देखील बघायला मिळाली होती. ऐश्वर्या राय ही देखील त्यावेळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. या लग्नाकडे संपूर्ण मीडियाच्या नजरा होत्या. मात्र, यावेळी असे काही घडले की, बच्चन कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड पापाराझी वरिंदर चावला यांनी अत्यंत मोठा खुलासा केलाय. वरिंदर चावला यांनी म्हटले की, बच्चन कुटुंबाकडून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचे आमंत्रण पापाराझी यांना देण्यात आले नव्हते. हेच नाही तर त्यांनी रस्ते देखील कव्हर करून घेतले होते. मी त्यावेळी त्यांच्या घराबाहेर होतो.

आम्हाला हे माहिती होते की, फोटो नेमके कुठून घ्यायचे. मात्र, त्यावेळी पापाराझींना येण्यापासून रोखण्यासाठी तिथेच बस उभी करण्यात आली. त्यावेळी पापाराझी यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. अनेक पापाराझी देखील जखमी झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नानंतर पापाराझी हे बच्चन कुटुंबियांवर प्रचंड नाराज झाले.

बच्चन कुटुंबाचा निषेध करण्यासाठी पापाराझी यांनी थेट बच्चन कुटुंबियांचे फोटो क्लिक करणेच बंद केले. बच्चन कुटुंबापैकी कोणी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात किंवा कार्यक्रमात दिसले तरीही पापाराझी यांच्याकडून कॅमेरे खाली केले जात असत. काहीही झाले तरीही बच्चन कुटुंबियापैकी कोणाचेही फोटो काढले जात नव्हते. एकप्रकारे पापाराझी निषेध करत होते.

यासर्व प्रकारानंतर अमिताभ बच्चन यांनी पापाराझी यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. त्यानंतर पापाराझी यांनी बच्चन कुटुंबियांचे फोटो काढण्यास सुरूवात केली. बरेच दिवस पापाराझी यांच्याकडून बच्चन कुटुंबाचा निषेध करण्यात आला. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.