AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा कोप्पिकर म्हणते अंधभक्त होण्याचा गर्व आहे..काय कारण?

कलाकार राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर कधी भूमिका घेत नाहीत अशी टीका होत असते. कलाकार नेहमीच सत्तेला शरण जाणेच पसंद करत असतात. त्यात आता एका अभिनेत्रीने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

ईशा कोप्पिकर म्हणते अंधभक्त होण्याचा गर्व आहे..काय कारण?
bollywood abhinetri isha koppikar
| Updated on: Aug 18, 2026 | 9:13 PM
Share

देशात सध्या ‘जेन झी’ आंदोलनानंतर एक सामाजिक घुसळण सुरु आहे. काही कलाकार सरकारच्या विरोधात बोलत आहेत तर काही कलाकार सरकारच्या बाजूने बोलत आहेत. त्यात आता आणखी एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. जर देशावर प्रेम करणे आणि त्याच्या प्रगतीची इच्छा बाळगणे यालाच ‘अंधभक्ती’ म्हटले जात असेल, तर ‘अंधभक्त’ असण्याचा मला अभिमान आहे असे या अभिनेत्री ईशा कोप्पिकर हीने म्हटले आहे.

ईशा कोप्पिकर हीने आपली भूमिका मांडताना माझी भक्ती कोणत्याही राजकीय पक्षासाठी नाही, तर माझ्या देशासाठी आहे. आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो आणि त्यांच्या धोरणांशी असहमत असू शकतो, परंतु माझ्या देशावर माझे प्रेम सदैव राहील असेही बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकर हीने म्हटले आहे.

ईशा हीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते ‘माणूस जिथे राहातो त्या जागेचा सन्मान करायला हवा, आणि त्यास चांगले करण्यासाठी आपले योगदान देखील दिले पाहिजे. केवळ एवढे बोलणे की आम्हाला आमच्या देशावर प्रेम आहे ही देश भक्ती नाही. असली देशभक्ती तेव्हा असते.जेव्हा कोणती व्यक्ती आपल्या कामाने देशाला चांगले बनवण्याचा प्रयत्न करते.’ अभिनेत्री ईशा कोप्पिकर हीने मुलांचे उदाहरण देत पुढे सांगितले की दोन प्रकारचे मुले असतात. एक मुल अस असते जे संपूर्ण जीवन आपल्या आई-वडीलांनी काय दिले आणि काही नाही दिले याचा हिशेब करत असते. तर दुसरे मुल असे असते जे आपल्या आई-वडीलांकडून मिळालेल्या वस्तू स्वत: पुरत्या मर्यादित ठेवत नाही. उलट त्याने आपल्या आई-वडीलांची जीवन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करते.

येथे पाहा व्हिडीओ –

ईशा पुढे म्हणाली की,’ दोन्ही मुलांच्या दरम्यान फरक केवळ परिस्थितीचा नाही, तर विचारांचा आहे. या विचाराने देशासाठी बदलण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येक वेळी विचारण्याच्या ऐवजी देशाला आपण काय दिले आहे आणि काय देऊ शकतो याचा विचार करायला हवा. आपल्याला हा विचार करायला हवा की आपले काम आणि विचाराने आपण भारतासाठी काय चांगले करु शकतो.’

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया