AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळाली, रस्त्यावर झोपली, शारीरिक छळ, ‘ही’ महिला आज आहे 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती

women life : वयाच्या 15 व्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडलं वडिलांचं घर... अनेक रात्र रस्त्यावर काढल्या, आज 'ही' महिला अविवाहित पण कोट्यवधी रुपयांचा मालकीण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिलेच्या संघर्षाची चर्चा...

वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळाली, रस्त्यावर झोपली, शारीरिक छळ, 'ही' महिला आज आहे 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती
| Updated on: Feb 06, 2024 | 3:07 PM
Share

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : मायानगरी मुंबईत अनेक कलाकार स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. पण कुटुंबाशिवाय आणि आर्थिक पाठबळ नसेल तर, मुंबईत राहणं फार कठीण आहे. पण मुंबईत येऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याची स्वप्न अनेक जण पाहतात. पण यशाच्या शिखरावर मात्र फार कमी जण पोहोचू शकतात. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी वडिलांचं घर सोडलं. बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे. जिने वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडलं आणि मुंबईत आली.

अभिनेत्री मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे काहीही नव्हतं. स्वतःचं घर नसल्यामुळे अभिनेत्री रस्त्यावर झोपली. अभिनेत्रीला शारीरिक छळाचा सामना करावा लागला. अनेकांनी अभिनेत्रीची फसवणूक केली. पण तिच्या मदतीला कधीच कोणी आलं नाही. अनेक कठीण प्रसंगाचा सामना केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या ज्या अभिनेत्री चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कंगना रनौत आहे. खुद्द कंगना हिने तिच्या वाईट दिवसांबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझा प्रवास फार कठीण होता. मुंबईत आली तेव्हा मी रॉयल आयुष्य जगत नव्हती. मी बस, टॅक्सी, ट्रेनमधून प्रवास केला आहे. पायी चालली आहे. माझ्याकडे घर नव्हतं म्हणून मी रस्त्यावर झोपली आहे….’

‘अनेकांच्या जाळ्यात मी अडकली होती, म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. वयाच्या 17 व्या वर्षी वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझं शोषण केलं. व्यक्ती बॉलिवूडमधील होता. मी त्याच्या जाळ्यात अडकली आहे मला कळलं होतं. तुम्हाला वाटतं लोकं तुमच्या मदतीसाठी येत असतात. पण फुकट जेवायला कोणी देत नाही.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर वार केला. मी रक्त बंबाळ अवस्थेत होती. त्या व्यक्ती विरोधात मी तक्रार दाखल केली. पण काहीही झालं नाही. त्याला समज दिली आणि त्याची सुटका झाली…’ कंगना हिने अनेक संकटांचा सामना करत यश मिळवलं आहे. कुटुंबातील कोणीही इंडस्ट्रीतील नसलं तरी, देखील अभिनेत्रीने स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं.

आज कंगना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने एक दोन नाही चार राष्ट्रीय पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. कंगना आज गडगंज संपत्तीची मालकीण आहे. कंगना एका सिनेमासाठी 15 ते 27 कोटी रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर देखील कंगना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...