AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम की पाप? जेव्हा श्रीमंत दिग्दर्शकाने भाचीसोबत थाटला दुसरा संसार… बदनामीच्या भीतीने उचललं मोठं पाऊल

असा मामा नसलेला बरा... जेव्हा लोकप्रिय आणि श्रीमंत दिग्दर्शकाने कुटुंबियांच्या विरोधात केलं सख्या भाचीसोबत लग्न... एका रात्रीत सर्वकाही बदललं... दिग्दर्शकाला बसला मोठा फटका... दिग्दर्शकाबद्दल जाणून व्हाल थक्क...

प्रेम की पाप? जेव्हा श्रीमंत दिग्दर्शकाने भाचीसोबत थाटला दुसरा संसार... बदनामीच्या भीतीने उचललं मोठं पाऊल
Vijay Aanand
| Updated on: Feb 23, 2026 | 10:54 AM
Share

हिंदी सिनेमाला एक इतिहास लाभलेला आहे. दमदार सिनेमे आणि गाण्यामुळे हिंदी सिनेमांची ख्याती जगभरात पसरली आहे. हे फक्त हिंदी सिनेविश्वातील दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींमुळे शक्य झालं झालं. सांगायचं झालं तर, प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशात हिंदी सिनेविश्वातील कलाकारांच्या देखील आहे. हिंदी सिनेविश्वाने जगात स्वतःची ओळख तर निर्माण केलीच, पण समाजातील अशा अनेक परंपरा मोडल्या आणि स्वतःच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हिंदू धर्मात प्रत्येक नात्याची एक वेगळी व्याख्या आहे… मामा आणि भाची म्हणजे बाप – लेकीचं नातं समजलं जातं… पण एक हिंदी दिग्दर्शकाने तर स्वतःच्या सख्या बहिणीच्या मुलीसोबत लग्न केलं. म्हणजे भाजीसोबत लग्न केलं. त्यानंतर मुलाचं देखील जगात स्वागत केलं…

दिग्दर्शकाच्या मोठ्या निर्णयामुळे फक्त कुटुंबियांनाच नाही तर, समाजाला देखील मोठा धक्का बसला होता. या दिग्दर्शकाने हिंदी सिनेविश्वाला एका पेक्षा एक सिनेमे दिले. पण एका निर्णयामुळे सर्वकाही उद्ध्वस्त झालं. सध्या ज्या दिग्दर्शकाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नाही तर, विजय आनंद आहे. इंडस्ट्री आणि संपूर्ण जगामध्ये त्यांची ओळख गोल्डी म्हणून आहे.

विजय आनंद यांनी अवघ्या 23 व्या वर्षी ‘नौ दो ग्यारह’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यांनी सिनेमाला फक्त मनोरंजनासाठी नाही तर, एक वेगळी स्टाइल दिली… ‘ओ हसीना जुल्फों वाली’ किंवा ‘होंठों में ऐसी बात’ अशा गाण्यामध्ये तर त्यांनी संपूर्ण जीव ओतून दिला. तेव्हा विजय आनंद यशाच्या शिखरावर होते. पण त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार सुरु होतं.

विजय आनंद यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. कारण ते जुन्या विचारांचे होते आणि पत्नीने सिनेमात काम करावं अशी त्यांची इच्छा नव्हती… तर पत्नी लवलीन हिला अभिनय विश्वात पदार्पण करायचं होतं.. अशात दोघांचे वाद टोकाला पोहोचले आणि त्यांचा घटस्फोट झाला.

पण खरा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा विजय आनंद यांनी सख्या भाचीसोबत लग्न केलं. 1978 मध्ये ‘राम बलराम’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. तेव्हा विजय यांनी असं पाऊल उचललं ज्याची कल्पना त्यांच्या कुटुंबियांनी देखील केली नसेल… विजय आनंद यांनी मोठ्या बहिणीची मुलगी सुषमा कोहली यांच्यासोबत लग्न केलं. कुटुंबियंच्या त्यांच्या लग्नाला विरोध होता कारण देघांचं मामा आणि भाचीचं नातं होतं.

जेव्हा विजय आनंद यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे भाऊ चेतन आणि देव आनंद यांच्यासह समाजाला प्रचंड धक्का बसला. या लग्नाने आनंद कुटुंबात एक वादळ निर्माण केलं जे वर्षानुवर्षे शांत झालं नाही. ज्या दिग्दर्शकाचं लोकांकडून कौतुक व्हायचं, त्याच दिग्दर्शकाला टीकेचा सामना करावा लागलेला.

समाजाच्या विरोधात जात त्यांनी भाची सुषमा हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील झाला, त्याचं नाव त्यांनी वैभव ठेवलं. आता विजय आनंद आणि सुषमा कोहली या जगात नाहीत. पण त्यांचे किस्से आजही चाहत्यांमध्ये रंगलेले असतात.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.