AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल आले अत्यंत मोठे अपडेट, 32 हजार मुली, चित्रपट निर्मात्यांनी दिले कोर्टाला आश्वासन

द केरळ स्टोरी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय. चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही वाद काही थांबताना दिसत नाहीये. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपट धमाल करतोय.

The Kerala Story | 'द केरळ स्टोरी' चित्रपटाबद्दल आले अत्यंत मोठे अपडेट, 32 हजार मुली, चित्रपट निर्मात्यांनी दिले कोर्टाला आश्वासन
The kerala story
| Updated on: May 05, 2023 | 7:47 PM
Share

मुंबई : द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अनेक मोठ्या वादांनंतर आज रिलीज झालाय. या चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठा गोंधळ निर्माण झाला. सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. अनेकांनी तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच कोर्टामध्ये धाव घेतल्या. मात्र, शेवटी अनेक वादांनंतर आज हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. इतकेच नाही तर विकेंडला द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) धमाल करेल असा दावा सातत्याने केला जातोय. या चित्रपटामध्ये अनेक मोठे आणि धक्कादायक (Shocking) खुलासे हे करण्यात आले आहेत.

विशेष बाब म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झालीये. चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे न्यायालयाने द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिलाय. मात्र, 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्यावर चित्रपट निर्मात्यांनी सहमती दाखवलीये.

न्यायमूर्ती नागारेश यांनी म्हटले की, त्या मुली 32 हजार होत्या हे तुम्ही कसे म्हणून शकता? द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांची बाजू मांडणाऱ्या रवी कदम यांनी सांगितले की, आम्हाला अशी माहिती सांगण्यात आली होती की, गायब होणाऱ्या मुलींचा आकडा हा 32 हजार होता आणि तिच माहिती ही आम्ही चित्रपटाच्या टिझरमध्ये दाखवली.

पुढे रवी कदम म्हणाले की, पण यानंतर आम्ही पुढे तसे म्हणणार नाहीत. इतकेच नाही तर वकिलांनी ते सर्व सोशल मीडियावर काढून टाकणार असल्याची देखील माहिती दिली. द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद कोर्टात पोहचलाय. चित्रपट निर्मात्यांना दिलासा देत चित्रपटावर बंदी येणार नसल्याचे तर स्पष्ट झाले आहे. चित्रपटही बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसतोय.

आज सकाळपासूनच प्रेक्षकांचा द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहण्यावर अधिक भर दिसतोय. चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे. ओपनिंग डेला चित्रपट 10 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाजा वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाचे काैतुक देखील केले आहे. अनेकांना हा चित्रपट जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल