AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan | मी याच देशात राहणार आणि इथेच मरणार आहे, जाणून घ्या आमिर खान असे नेमके का म्हणाला?

बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मोठ्या पडद्यापासून आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून दूर आहे.

Aamir Khan | मी याच देशात राहणार आणि इथेच मरणार आहे, जाणून घ्या आमिर खान असे नेमके का म्हणाला?
| Updated on: Apr 15, 2023 | 10:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान (Aamir Khan) याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही आमिर खान हा दिसला. या चित्रपटात आमिर खान याच्यासोबत करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही देखील मुख्य भूमिकेत होती. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर आपला जलवा दाखवता आला नाही आणि आमिर खान याचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. मुळात म्हणजे लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडून आमिर खान याला प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

जेंव्हापासून लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेलाय, तेंव्हापासूनच आमिर खान हा बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर गेलाय. इतकेच नाही तर तो कोणत्याही पार्टीला हजेरी लावत नाही. एका मुलाखतीमध्ये आमिर खान याने खुलासा केला होता की, मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सतत काम करत आहे. यामुळे मी माझ्या कुटुंबाला अजिबात वेळ देऊ शकलो नाहीये, यामुळे मी आता काही वर्ष कुटुंबाला वेळ देणार आहे.

काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये आमिर खान याची पांढरी दाढी, पांढरे केस पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. आमिर खान हा नेहमीच वादामध्ये सापडतो. 2015 मध्ये आमिर खान याने एक वादग्रस्त विधान केले होते. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी आमिर खान याला खडेबोल सुनावण्यासही सुरूवात केली होती.

2015 च्या मुलाखतीमध्ये असहिष्णुतेच्या विषयावर बोलताना आमिर खान याने थेट देशात सुरक्षेत वाटत नसल्याचे म्हणत देश सोडण्याची भाषा केली होती. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टिका झाली. त्यानंतर काही दिवसांनीच एक मुलाखत आमिर खान याने दिली आहे. आपले म्हणणे चुकीच्या पध्दतीने आणि वाढून सांगण्यात आल्याचे आमिर खान याने म्हटले.

आमिर खान म्हणाला होता की, मी याच देशात राहणार आहे आणि याच देशात मरणार आहे. माझ्या पत्नीने मुलांच्या भविष्यासाठी भावूक होत हे म्हटले होते. मी असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे विदेशात एकही घर नाहीये. माझे जे काही चार ते पाच घर आहेत ते फक्त आणि फक्त भारतामध्येच आहेत. मी कुठे जाणार नाहीये. माझ्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले गेल्याचे देखील आमिर खान याने म्हटले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.