AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तमन्ना भाटियाचा बॉयफ्रेंड अभिनेता विजय वर्मा या आजाराने ग्रस्त; घ्यावा लागतो मेकअपचा आधार

अभिनेता विजय वर्मा एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्याने स्वत:च याबाबतचा खुलासा केला होता. तसेच या आजारावर कोणताही अचूक उपचार अजून सापडलेला नाही.

तमन्ना भाटियाचा बॉयफ्रेंड अभिनेता विजय वर्मा या आजाराने ग्रस्त; घ्यावा लागतो मेकअपचा आधार
| Updated on: Jan 01, 2025 | 3:54 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे फार कमी वेळात नावारुपाला आले. स्वत:च्या हिंमतीवर या कलाकरांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असाच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे विजय वर्मा. विजय वर्मा हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. या अभिनेत्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. अनेक वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. पण विजय वर्माची जास्त चर्चा झाली ती त्याच्या आणि तमन्ना भाटियाच्या नात्यामुळे.

मिर्झापूर, गली बॉईज, डार्लिंग यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क करणारा अभिनेता विजय वर्माला आज परिचयाची गरज नाही. त्याने अनेक भूमिका केल्या आहेत.परंतु आता विजयची चर्चा होतेय ती एका आजाराचे निदान झाल्यामुळे.

अभिनेता विजय वर्मा कोणत्या आजाराने ग्रस्त

एका मुलाखतीत विजयने सांगितले की तो एका आजाराने ग्रस्त आहे. विजय वर्मा त्वचेच्या दुर्मिळ समस्येने त्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात आणि ते लपवण्यासाठी मेकअपचा वापर करावा लागतो. असंही त्याने सांगितले.

नक्की विजयला कोणता आजार झाला आहे? या आजाराला नक्की काय म्हणतात आणि या आजाराची लक्षणे काय आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया.

विजय वर्माला कोणता आजार झालाय?

अलीकडेच एका वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, विजय वर्माने खुलासा केला की तो त्वचारोगाने ग्रस्त आहे ज्याचे नाव विटिलिगो आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात आणि ते लपवण्यासाठी त्याला मेकअपचा आधार घ्यावा लागतो. विटिलिगो हा इंग्रजी शब्द असून याला मराठीत कोड असंही म्हटलं जातं.

विटिलिगो त्वचारोग म्हणजेच पांढऱ्या डागांची समस्या आणि हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात रंगद्रव्य निर्माण होऊन त्वचेचा मूळ रंग हरवतो आणि पांढरे ठिपके तयार होऊ लागतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विटिलिगोमध्ये शरीरातील मेलेनिनचे उत्पादन कमी करणाऱ्या पेशी हळूहळू मरायला लागतात, त्यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात.

विटिलिगोची लक्षणे

त्वचेवर दुधाळ-पांढरे डाग तयार होणे त्वचेचा रंग कमी होणे किंवा रंग उडून जाणे त्वचेचा रंग खराब होत असलेल्या भागात केस असतील तर ते राखाडी होऊ शकतात वा त्याचा रंग बदलू शकतो तुमच्या तोंडाच्या किंवा नाकाच्या आतील भागामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो डोळ्यातील पडदा अर्थात रेटिनाचा रंग फिका पडू लागतो

विटिलिगो न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

विटिलिगो त्वचारोगावर अद्याप कोणताही अचूक उपचार नाही, जे काही उपचार अस्तित्वात आहेत ते फक्त त्याचा प्रसार थांबवतात. विटिलिगोची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यावर औषधे आणि क्रीम्सद्वारे तो बरा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यासाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो.

याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हा प्रसार पूर्णपणे थांबतो, तेव्हा नॅरो बँड थेरपी देखील दिली जाऊ शकते. याशिवाय एक्सायमर लेसरमधील यूव्हीबी प्रकाशाच्या माध्यमातून त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन वाढवून मूळ रंग परत आणता येतो, त्यामुळे पांढरे डाग पसरण्यास प्रतिबंध करता येतो.

(डिस्क्लेमर: वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवरून दिलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.