AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांना स्टारडम मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लेखकाचा मृत्यू; बिग बी, अनिल कपूर गहिवरले

बॉलिवूडसाठी मोठी आणि दु:खदायक बातमी आहे. प्रसिद्ध संवाद लेखक आणि पटकथा लेखक प्रयागराज यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर दु:खाचा डोंगरच कोसळला असून अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अमिताभ बच्चन यांना स्टारडम मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लेखकाचा मृत्यू; बिग बी, अनिल कपूर गहिवरले
Prayagraj Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2023 | 6:56 AM
Share

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांचं स्टारडम कायम राखणाऱ्या सिनेमांच्या प्रसिद्ध लेखकाचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध स्क्रीनरायटर प्रयागराज यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षाचे होते. शनिवारी वांद्रे येथील निवासस्थानी प्रयागराज यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे चिरंजीव आदित्य यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. प्रयागराज यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. प्रयागराज यांच्या निधनावर बिग बी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

आदित्य यांनी प्रयागराज यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. वडील प्रयागराज यांनी वांद्रे येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही आजार झाले होते. पण त्यांची प्रकृती स्थिर होती. गेल्या 10 वर्षापासून त्यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यावर उपचारही सुरू होते. पण हा आजार पूर्णपणे बरा झाला नव्हता, असं आदित्य यांनी सांगितलं. प्रयागराज यांनी वयाच्या 88 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक एवढेच लोक उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांचं स्टारडम राखलं

अमिताभ बच्चन जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांचं स्टारडम राखण्याचं काम ज्या ज्या सिनेमांनी केलं. त्यातील काही सिनेमे प्रयागराज यांच्या लेखणीतून उतरले होते. अमर अकबर अँथोनी, गिरफ्तार, नसीब, कुली, परवरिश (1977), सुहाग (1979), नसीब (1981), कुली (1983), मर्द (1985), गंगा जमुना सरस्वती (1988) आणि अजूबा (1991) आदी सिनेमांचं पटकथा लेखन त्यांनी केलं होतं. या सिनेमांमुळे अमिताभ बच्चन यांचं स्टारडम कायम राखलंच शिवाय अमिताभ यांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं होतं.

तसेच त्यांनी हिफाजत या सिनेमाचंही लेखन केलं होतं. या सिनेमात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी काम केलं होतं. तर राजेश खन्ना यांच्या रोटी आणि धर्मेंद्र- जितेंद्र अभिनित धरमवीर सिनेमाची पटकथाही त्यांनी लिहिली होती.

त्यांनी फुल बने अंगारे या सिनेमाचे संवाद लिहून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर झुक गया आसमान (1968), भाई हो तो ऐसा (1972), रोटी (1974), आणि धरम करम (1975) सिनेमाचे संवाद लिहिली होते.

अमिताभ यांना दु:ख

प्रयागराज यांच्या निधनावर अमिताभ बच्चन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं आहे. कालच्या संध्याकाळी आपण या महान इंडस्ट्रीतील आणखी एक मजबूत आधार स्तंभ गमावला आहे, असं अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणत प्रयगराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अनिल कपूर यांना शोक अनावर

अभिनेते अनिल कपूर यांनी ही प्रयागराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. प्रयागराज यांच्या निधनावर मी प्रचंड दु:खी आहे. त्यांच्यासोबत हिफाजत सिनेमात काम करण्याचं भाग्य मिळालं. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं अनिल कपूर यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

Follow Us
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....