Happy Birthday Ranbir Kapoor | अभ्यासाचा नेहमीच कंटाळा, पार्टीत ऐश्वर्या रायला देखील रणबीर कपूरने सांगितले होते खोटे मार्क्स!

रणबीरने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये हे बिंधास्त सांगितले होते की, त्याला सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये विशेष रस नव्हता. त्याला नेहमी क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहायला आवडायचे. रणबीर कपूर दक्षिण मुंबईच्या माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकला.

Happy Birthday Ranbir Kapoor | अभ्यासाचा नेहमीच कंटाळा, पार्टीत ऐश्वर्या रायला देखील रणबीर कपूरने सांगितले होते खोटे मार्क्स!
Ranbir Kapoor
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:57 AM

मुंबई : ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी झाला. प्रत्येकाला माहित आहे की, रणबीर बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर कुटुंबातील आहे. आपल्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणेच त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रणबीर कपूरने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले.

रणबीरने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये हे बिंधास्त सांगितले होते की, त्याला सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये विशेष रस नव्हता. त्याला नेहमी क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहायला आवडायचे. रणबीर कपूर दक्षिण मुंबईच्या माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकला. जेव्हा त्याने दहावी उत्तीर्ण केली होती, तेव्हा रणबीरची आजी कृष्णा कपूर यांनी त्यांच्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स देखील उपस्थित होते.

ऐश्वर्याला सांगितले खोटे मार्क्स!

रणबीर कपूरने दहावीत 54.3% गुण मिळवले होते. ज्यासाठी आजी कृष्णाने घरात एक मोठी पार्टी आयोजित केली होती. सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनेही या पार्टीला हजेरी लावली होती. रणबीर कपूरने पार्टीमध्ये ऐश्वर्या रायला आपल्याला 65% गुण मिळाल्याचे सांगितले होते. याचा खुलासा ऐश्वर्या राय बच्चनने स्वतः ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता. ऐश्वर्या रायने सांगितले की, त्या वेळी रणबीरने तिला सांगितले होते की, सगळे त्याच्या या मार्क्सवर खूप आनंदी आहेत.

रणबीरची कारकीर्द

राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर याने 2007 मध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी त्याने संजय लीला भन्साळी यांना अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या ‘ब्लॅक’ मध्ये सहाय्य केले होते. ‘सावरिया’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण या चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली.

‘सावरिया’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’ नंतर रणबीर कपूरने सिद्ध केले की, तो एक प्रतिभावान कलाकार आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी रणबीरचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 2010 मध्ये, प्रकाश झाच्या ‘राजनीती’त रणबीरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

‘अंजाना-अंजानी’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘जग्गा जासूस’ या चित्रपटांपासून संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’ पर्यंत रणबीर कपूरने आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत असल्यामुळे देखील चर्चेत आहे. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | एकटं फिरण्यावरही बंधन येणार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जोडी की बेडी’चा नवा खेळ रंगणार!

Shruti Marathe : श्रुती मराठेच्या ‘गोड गोजिरी अदा….’, फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल फिदा!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.