AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते जितेंद्र बोहल्यावर, गळ्यात वरमाळा टाकली अन्… 50 व्या वाढदिवशीच काय घडलं?

अभिनेते जितेंद्र पुन्हा एकदा बोहल्यावर चढले आहेत. जितेंद्र आणि शोभा कपूर यांचा लग्नाचा आज 50 वा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसीच जितेंद्र यांनी दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक नामांकीत कलाकारांनी हजेरी लावली. जितेंद्र यांच्या लग्नाचा मोठा जंगी कार्यक्रम यावेळी पार पडला.

अभिनेते जितेंद्र बोहल्यावर, गळ्यात वरमाळा टाकली अन्... 50 व्या वाढदिवशीच काय घडलं?
अभिनेते जितेंद्र दुसऱ्यांदा बोहल्यावर
| Updated on: Dec 16, 2024 | 7:26 PM
Share

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र यांनी आज पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 50 वर्षांपूर्वी त्यांनी शोभा कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांचं 16 डिसेंबर 1974 ला लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाचा आज 50 वा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या या गोल्डन जुबलीच्या निमित्ताने जितेंद्र आणि शोभा यांनी पुन्हा एकदा एकमेकांसोबत लगीनगाठ बांधली आहे. जितेंद्र यांचे मुलगा तुषार कपूर आणि मुलगी एकता कपूर यांनीच आपल्या आई-वडिलांना लग्नाच्या 50 व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्न करण्याची आयडिया दिली होती. ही आयडिया त्यांनी सत्यात साकारली. विशेष म्हणजे संपूर्ण बॉलिवूड या सोहळ्याला हजर राहिलं. मेहंदी, संगीत, वरमाला या सर्व रितीरिवाजांना फॉलो करत जितेंद्र आणि शोभा कपूर यांनी पुन्हा एकदा विवाह केला.

जितेंद्र आणि शोभा कपूर यांच्या भव्य लग्न सोहळ्याला त्यांचे चित्रपटसृष्टीतील अनेक मित्र सहभागी झाले. यामध्ये अभिनेता अनिल कपूर, राकेश रोशन, प्रेम चोप्रा यांचा समावेश होता. फक्त बॉलिवूड नाही तर रुचिरा कपूर, अनीता हसनंदानी, क्रिस्टल डिसूजा, नीलम कोठारी, रिद्धी डोगरा, समीर सोनी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

जितेंद्र यांच्या गाण्यांवर अनेकांचा ठेका

जितेंद्र आणि शोभा कपूर यांच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात एकता कपूर हिच्यासोबत रिद्धी डोगरा आणि क्रिस्टल डिसूजा यांनी जितेंद्रच्या गाजलेल्या अनेक गाण्यांवर ठेका धरला. या कार्यक्रमात अभिनेता समीर सोनी याने जितेंद्र बनत अनेक मुलींसोबत डान्स केला. विशेष म्हणजे नवरदेव-नवरीने एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकल्यानंतर केक कापूनही सेलिब्रेशन झालं

आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकता कपूर हिने खास हॅशटॅग बनवला होता. त्यांचे अनेक मित्र ‘शोभा जीत गयी’ असं लिहून जितेंद्र आणि शोभा यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. या हॅशटॅगमध्ये शोभा आणि जितेंद्र या दोघांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं.

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

जितेंद्र आणि शोभा यांची रंजक प्रेम कहाणी

जितेंद्र आणि शोभा कपूर यांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे. जितेंद्र हे 21 वर्षांचे होते, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा शोभा सिप्पी यांना पाहिलं होतं. शोभा त्यावेळी केवळ 14 वर्षांच्या होत्या. दोघांसाठी खरंतर त्यावेळी ते पहिल्या नजरेतलं प्रेम होतं. पण त्यांच्या मनातलं प्रेम ओठांवर येऊ शकलं नव्हतं. त्यानंतर दोन्ही जण आपल्या आयुष्यात पुढे गेले. यानंतर मग जितेंद्र यांचं नाव हेमा मालिनी यांच्यासोबत जोडलं गेलं. कुटुंबाच्या दबावामुळे दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं देखील होतं. पण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या मदतीसाठी आले होते. दोघांचं लग्न मोडलं आणि शेवटी 31 व्या वर्षी जितेंद्र यांनी शोभा कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.