AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Up Show : कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये वीरदास सहभागी होणार? वीर दास म्हणाला…

कंगना रनौतचा या कार्यक्रमात अभिनेता वीर दास सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा होतेय. यावर वीर दास ट्विट करत याचं खंडण केलं आहे.

Lock Up Show : कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये वीरदास सहभागी होणार? वीर दास म्हणाला...
कंगना रनौत, वीर दास
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 2:01 PM
Share

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) एक नवा शो येऊ घातलाय. ज्याचं नाव आहे, ‘लॉक अप’(Lock Up). या शोचं कंगना रनौत अँकरिंग करणार आहे. एकता कपूरचा (Ekta Kapoor) हा नवा कार्यक्रम Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता वीर दास सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा होतेय. यावर वीर दास ट्विट करत याचं खंडण केलं आहे. याबाबत बातम्याही प्रसारित झाल्या, त्यावरही वीर दासने नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात कंगना आणि वीर दास हे पूर्णपणे भिन्न विचारांचे आहेत. अश्यात हे दोघे एकाच कार्यक्रमात दिसणार असल्याची चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं.

वीरदासचं ट्विट

कंगनाच्या ‘लॉक अप’ या कार्यक्रमात वीर दास सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. यावर वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “ज्यांनी मी या कार्यक्रमात सहभागी होणार असं कोण बोललं मला माहीत नाही. बरेच लोक माझ्याबद्दल लिहित आहेत. पण त्यांनी माझ्याशी संपर्क न करता हे लिहिलं आहे. मला त्यात रसही नाही. ‘लॉक अप’साठी कंगना आणि तिच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!”

बऱ्याच दिवसांपासून वीर दास कंगनाच्या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केलं. कारण या दोन कलाकारांमध्ये खूप वाद आहेत. दोघेही पूर्णपणे भिन्न विचारसरणीचे आहेत. पण वीर दासने त्याच्या Twitter वर एक पोस्ट शेअर करत हे वृत्त फेटाळून लावलं आहे.या सगळ्या अफवा असल्याचं त्याने म्हटलंय.

कंगना पहिल्यांदाच करणार कार्यक्रम होस्ट

कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सध्याही तिच्या काही चित्रपटांचं चित्रिकरण सुरू आहे. चुकतंच तिचा ‘थलायवी’ आला होता. ‘धाकड’ आणि ‘तेजस’या सिनेमांमधून ती लवकरच मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना पुहायला मिळणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. याशिवाय कंगना तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या

लता दिदींच्या अंत्यसंस्कारावेळी नेमकं काय घडलं?, अभिनेत्री हेमांगी कवीची नवी फेसबुक पोस्ट, म्हणते, ‘चहापेक्षा किटली गरम’

VIDEO : अपघातानंतर बघ्यांची गर्दी, मदतीला कोणीच नाही, पण Sonu Sood ने तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले!

Amrita Singh Birthday : अमृता सिंहचं करिअर, 12 वर्षांनी लहान सैफ अली खानवर प्रेम-लग्न-घटस्फोट, सगळं वाचा एका क्लिकवर…

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.