AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांनी केला खळबळजनक खुलासा, चाहते हैराण, थेट म्हणाले माझ्या पत्नीची…

शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच अरबाज खान याच्या शोमध्ये मोठा खुलासा केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आता यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांनी केला खळबळजनक खुलासा, चाहते हैराण, थेट म्हणाले माझ्या पत्नीची...
| Updated on: Mar 03, 2023 | 9:57 PM
Share

मुंबई : नुकताच शत्रुघ्न सिन्हा हे अरबाज खान याच्या ‘द इनव्हिन्सिबल’ शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यामधील अनेक किस्से सांगितले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी पत्नी पूनम हिच्यासोबत पहिली भेट कशी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाली हे देखील सांगितले. शोमध्ये त्यांनी चित्रपटातील अनेक मजेशीर किस्से देखील सांगितले आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी अर्थात बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लवकरच अक्षय कुमार याच्यासोबत एका बिग बजेटच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे. सोनाक्षी सिन्हा हिने यापूर्वी अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

अरबाज खान याच्या शोमध्ये बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आयुष्यामध्ये केलेल्या चुकांबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी मान्य केले की, आपण पत्नी पूनम सिन्हा हिला धोका दिला आणि तिच्यापासून वेगळे होण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना त्यांची चूक काही दिवसांनंतर लक्षात आली.

विशेष म्हणजे पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे पहिल्या भेटीच्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर लग्न झाले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मला माहिती नव्हते की, माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी अभिनेता होईल. पुढे काय होणार याची कल्पना मला मुळीच नव्हती किंवा मी त्याचा विचार केला नव्हता.

आम्ही बोलणे बंद केले आणि तो माझा निर्णय होता. विशेष म्हणजे हे त्यावेळी झाले होते, ज्यावेळी माझ्या आयुष्यात खूप काही घडत होते…मी त्याबद्दल काही बोलणार नाहीये….कारण ती माझी चूक होती. मी फक्त पूनम आणि माझ्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारणे शोधत होतो आणि नात्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होतो.

मी एक दिवस पूनम हिला म्हणालो की, तू माझ्यासाठी खूप चांगली आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मुळात ही पूर्णपणे माझी चूक होती, मी फक्त स्टारडममध्ये अडकलो होतो. मला अगोदर वाटत होते की, कोणतीही महिला माझ्यामध्ये रस घेणार नाही. मात्र, काही दिवसांमध्ये संपूर्ण परिस्थिती बदलत गेली आणि मी माझे नियंत्रण गमावले.

मी तिला एक प्रकारचा घटस्फोट दिला. इतकेच नाहीतर मी तिच्यासोबतचे सर्व संपर्क देखील तोडले. मला काही दिवसांनी कळाले की, पूनम मला शोधत आहे. इतकेच नाहीतर मी तिच्यासोबत असलेल्या नात्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती माझ्या कर्मचाऱ्यांना माझी काळजी घेण्याचे सांगत होती, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या या मोठ्या खुलाशाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.