अनेक सुपरहिट चित्रपट देणारा सलमान जेव्हा ‘अंतिम’मधील भूमिकेला घाबरला! जाणून घ्या नेमकं कारण काय..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (aayush sharma) यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सलमानने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

अनेक सुपरहिट चित्रपट देणारा सलमान जेव्हा ‘अंतिम’मधील भूमिकेला घाबरला! जाणून घ्या नेमकं कारण काय..
Salman Khan
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 11:41 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (aayush sharma) यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सलमानने पोलिसाची भूमिका साकारली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी आता सलमान खानने चाहत्यांना विश्वास बसणार नाही असे वक्तव्य केले आहे. वास्तविक, आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारणारा सलमान म्हणतो की, अंतिममधील भूमिका साकारताना तो खूप घाबरला होता.

ई-टाइम्सशी बोलताना सलमान म्हणाला की, अंतिममधील पोलिस अधिकाऱ्याची त्याची भूमिका त्याने आतापर्यंत साकारलेल्या पोलिसांच्या पात्रांपेक्षा वेगळी होती. ही व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला नर्व्हस वाटले होते का, असे जेव्हा सलमानला विचारण्यात आले, तेव्हा सलमान म्हणाला, ‘माझ्या पात्राचे काय करायचे हे मला माहीत होते. मला ती व्यक्तिरेखा जशी वर्णन केली गेली होती तशीच साकारायची होती. महेश मांजरेकर या व्यक्तिरेखेबाबतही असाच विचार करत होते. पण, शूट सुरू करताच मला भीती वाटली की, त्यांनी मला जे सांगितलं ते मी काहीच करत नाहीये.

…तर आयुषचं पात्र कमी पडलं असतं!

सलमान पुढे म्हणाला की, ‘पण नंतर मला वाटले की, आयुष त्याच्या पद्धतीने त्याचे पात्र साकारतो आहे, ज्याप्रमाणे मला वाटले होते की, मीही माझी भूमिका चांगली साकारली पाहिजे. मी जर त्यांच्यासारखंच माझं पात्र केलं असतं, तर त्याचं पात्र मरून गेलं असतं. आम्ही दोघंही आपापल्या भूमिका एकाच पद्धतीने करू शकलो नाही. आयुषने एका शक्तिशाली माणसाची भूमिका साकारली आहे, जो आतून खूप रागावलेला आहे. माझी व्यक्तिरेखा एका हसवणाऱ्या व्यक्तीची होती. पाणी फेकले तरी तो हसूनच ते फेकतो. त्यामुळे त्याला त्याची ताकद माहीत आहे. त्यामुळे मी माझे पात्र खूप विचार करून साकारले आहे. पण शूट करतान खूप मजा आली.

शीख पोलिसाची भूमिका बजावण्याची जबाबदारी

सलमान म्हणाला, ‘चित्रपटात मी एका शीख पोलिसाची भूमिका करत होतो, त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती. मी कोणताही समुदाय किंवा संस्कृती सादर करतो, तेव्हा त्यांचा नेहमीच आदर होईल याकडे मी व्यवस्थित लक्ष देतो. मी माझ्या सर्व चित्रपटांमध्ये हे लक्षात ठेवले आहे.’

सलमानने असेही सांगितले की, त्याने चित्रपटात घातलेला कडा त्याला अनेकदा त्रास देत होता. अभिनेत्याने सांगितले की, ‘शूटिंग करताना काही सीन करताना अनेकदा हाताला दुखापत झाल्यासारखे वाटत होते.’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सलमान अंतिमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानने सांगितले की, तो या चित्रपटाचे प्रमोशन गुजरात, दिल्ली आणि त्याच्या गावी इंदूरमध्ये करणार आहे.

हेही वाचा :

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | धुमधडाक्यात सुरुये विकी-कतरिनाच्या लग्नाची तयारी, पाहुण्यांसाठी तब्बल 40 हॉटेल बुक!

Video | नको तिथेच बरोबर कट कसा?, नोरा फतेहीचा टॉप पाहून भडकले चाहते, पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.