AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty | ‘जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा त्याबदल्यात प्रेमाची अपेक्षा असते…’, शिल्पा शेट्टीची पोस्ट राज कुंद्रासाठी?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्यावसायिक पोस्ट व्यतिरिक्त, ती कधीकधी असे कोट सामायिक करते, ज्याचा अर्थ खूप महत्वाचा असतो. राज कुंद्राला (Raj Kundra) अटक झाल्यानंतरही शिल्पाने अशा अनेक पोस्ट केल्या होत्या.

Shilpa Shetty | ‘जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा त्याबदल्यात प्रेमाची अपेक्षा असते...’, शिल्पा शेट्टीची पोस्ट राज कुंद्रासाठी?
Shilpa Shetty
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 12:46 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्यावसायिक पोस्ट व्यतिरिक्त, ती कधीकधी असे कोट सामायिक करते, ज्याचा अर्थ खूप महत्वाचा असतो. राज कुंद्राला (Raj Kundra) अटक झाल्यानंतरही शिल्पाने अशा अनेक पोस्ट केल्या होत्या. आता शिल्पाने पुन्हा अशी पोस्ट केली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रेम आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे.

वास्तविक, शिल्पाने एका पुस्तकाच्या पानाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यात लिहिले आहे की, ‘जर तुमचे हृदय एखाद्याची काळजी करत असेल, तर तुम्ही नक्कीच जिंकता.’ पुढे, पोस्टमध्ये स्पष्ट केले गेले आहे की, ‘एखाद्याच्या प्रेमात असणे सोपे आहे, प्रेम करणे सोपे आहे. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा आपल्याला त्या बदल्यात प्रेम हवे असते. जेव्हा आपण प्रेम करतो, तेव्हा आपण स्वतःला शरण जातो. जेव्हा आपण एखाद्यावर असे प्रेम करतो, तेव्हा आपण आपल्या सर्वोत्तम टप्प्यात असतो.’

‘आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असणे, हे आपले स्वप्न आहे, परंतु प्रेम करणे आणि प्रेम मिळवणे हे सर्वांपेक्षा जास्त असले पाहिजे. मला फक्त प्रेमात राहायचे नाही तर प्रेमही करायचे आहे’, असे देखील या पानावर लिहिले आहे.

पाहा पोस्ट :

यापूर्वीची पोस्ट जबाबदारीबाबत!

शिल्पाने याआधी एक पोस्ट टाकली होती, ज्यात लिहिले होते की, ‘तुम्ही आयुष्यात जे काही निर्णय घ्याल त्याची जबाबदारी नक्कीच घ्या. जीवनात आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याचा परिणाम काहीही झाला तरी त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी.’

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल कुटुंबासह, तसेच कामामध्ये वेळ घालवत आहे. राजला अटक झाली तेव्हा तिने एकट्याने कुटुंबाची काळजी घेतली. यासोबतच तिने घराची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतली.

प्रोफेशनल लाईफ

शिल्पाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर आजकाल ती सुपर डान्सर शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. राजला अटक झाल्यानंतर शिल्पाने शोमधून ब्रेक घेतला, पण त्यानंतर अभिनेत्रीने काही दिवसांनी शोमध्ये परत एंट्री घेतली. याशिवाय तिचा ‘हंगामा 2’ हा चित्रपट जुलैमध्ये रिलीज झाला होता, ज्याद्वारे शिल्पा 10 वर्षानंतर अभिनय विश्वात परतली.

आता शिल्पा इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये दिसणार आहे. करण जोहरसोबत ती या शोला जज करणार आहे. आतापर्यंत मलायका अरोरा आणि किरण खेर करणसोबत शोचे जज करायचे, पण या वर्षी शिल्पा आणि करण जज करणार आहेत. याशिवाय शिल्पा आता ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

Drugs Case |  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी होता फरार, सुशांत सिंह राजपूतचा मित्र कुणाल जानीला अखेर अटक!

पुन्हा एकदा चर्चेत आली रानू मंडल, तिच्याच शैलीत गायलं ‘Manike Mage Hithe’ गाणं – पाहा व्हिडीओ

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.