AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन-सलमानच्या वादावर पहिल्यांदाच व्यक्त झाले वडील बोनी कपूर; म्हणाले “सलमानमुळेच अर्जुनने..”

अर्जुन कपूर आणि सलमान यांच्यात आता मलायकामुळे शीतयुद्ध असलं तरी एकेकाळी अर्जुनला बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी सलमानने मोठी मदत केली होती. ‘इशकजादे’ हा पहिलावहिला प्रोजेक्ट सलमानने अर्जुनला मिळवून दिला होता.

अर्जुन-सलमानच्या वादावर पहिल्यांदाच व्यक्त झाले वडील बोनी कपूर; म्हणाले सलमानमुळेच अर्जुनने..
सलमान खान, अर्जुन कपूर-मलायका अरोराImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2024 | 8:47 AM
Share

अभिनेता अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यात आता वितुष्ट आलं जरी असलं तरी एकेकाळी या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. अर्जुन सध्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करतोय. मलायका ही अरबाज खानची पूर्व पत्नी आणि सलमानची पूर्व वहिनी होती. मलायकासोबतच्या नात्यामुळे अर्जुन आणि सलमानच्या मैत्रीत फूट निर्माण झाली. असं असलं तरी अर्जुनला अभिनेता म्हणून घडवण्याचं श्रेय हे सलमानलाच जातं, असं खुद्द त्याचे वडील बोनी कपूर म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते अर्जुन आणि सलमानमधल्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. त्याचप्रमाणे अर्जुनसोबतच्या मैत्रीत कटुता आल्याने सलमानसोबतच्या नात्यात काही फरक काही पडला का, याचंही उत्तर त्यांनी दिलं.

या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “मी मोनाशी (पहिली पत्नी) विभक्त झालो असलो तरी अर्जुनला अभिनेता व्हायचंय हे कधीच माझ्या डोक्यात आलं नव्हतं. मला खरंतर सलमान खानने फोन केला होता आणि तो म्हणाला की, अर्जुन अभिनेता होईल. यासाठी स्वत: सलमानने त्याच्याकडून सर्वकाही करून घेतलं. सलमानमुळेच अर्जुनने वजन कमी केलं होतं. त्यावेळी अर्जुनचं वजन खूप जास्त होतं.”

“अर्जुन आज ज्याठिकाणी आहे, त्यासाठी मी सलमानला श्रेय देईन. आज जे काही बोललं किंवा केलं जातं, कदाचित त्या दोघांमध्ये चांगलं नातं नाही. म्हणजे त्या दोघांचं समीकरण आता पहिल्याप्रमाणे राहिलं नाही. पण सलमानने अर्जुनसाठी बरेच प्रयत्न केले. अर्जुनची प्रगती ही बऱ्याच अंशी सलमानने प्रभावित होती. मग त्याचं दिसणं असो, अभिनय असो, चित्रपटांची निवड असो.. सलमाननेच त्याला घडवलंय. चांगलं शरीर असण्यामागचं महत्त्व काय असतं, हे सलमानने अर्जुनच्या मनात बिंबवलं,” असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यातील कटुतेचा परिणाम तुमच्यासोबतच्या नात्यात झाला का, असा प्रश्न विचारल्यावर ते पुढे म्हणाले, “ते कधीच बदललं नाही. माझं आजही सलमानवर खूप प्रेम आहे. मला असं वाटतं की त्याच्यासारखे लोक खूप कमी असतात. त्याच्याइतका मोठ्या मनाचा, प्रेमळ माणूस सापडणार नाही. तो माझा खूप आदर करतो.”

अर्जुन आणि सलमान यांच्यात एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. मात्र मलायकामुळे या दोघांच्या मैत्रीत कटुता आली. त्यामुळे आजही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधी सलमान आणि अर्जुन एकमेकांसमोर आले, तरी ते दुर्लक्षच करतात. नुकत्याच एका पार्टीत सलमानने बाजूलाच उभ्या असलेल्या अर्जुनकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ