AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौत कानशिलात प्रकरण, चिराग पासवान म्हणाले, ‘महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण…’

Cabinet Minister Chirag Paswan on Kangana Ranaut | 'महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण...', कंगनाला महिला CISF जवानाने लगावली कानशिलात, कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चिराग पासवान यांच्या वक्तव्याची चर्चा...

कंगना रनौत कानशिलात प्रकरण, चिराग पासवान म्हणाले, 'महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण...'
| Updated on: Jun 11, 2024 | 1:21 PM
Share

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत विजयाचा आनंद साजरा करत असतानाच एका महिला CISF जवानाने त्यांना कानशिलात लगावली. कंगना चंदीगड विमानतळावर असताना त्यांना महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत कंगना यांचं समर्थन केलं. आता हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

चिराग पासवान म्हणाले, ‘तुम्ही तुमचं म्हणणं मांडण्यासाठी शिव्या आणि मारहाण करत असाल तर हे चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले विचार मांडू शकतो. महिला कॉन्स्टेबलच्या भावना देखील मी समजू शकतो, त्यांची त्याठिकाणी आई बसली होती, त्यांना वाईट वाटलं असेल. पण मर्यादीत शब्दांत त्यांनी स्वतःच्या भावना मांडायला हव्या होत्या…

पुढे चिराग पासवान म्हणाले, ‘प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे. कंगना यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं. त्याच प्रमाणे महिला CISF जवानाने त्यांचं म्हणणं मांडायला हवं होतं. कोणतीही व्यक्ती महिला किंवा पुरुषावर हात उचलू शकत नाही. फक्त महिलांवर हात उचलू नये असं मी म्हणत नाही, पुरुषांवर देखील हात उचलणं चुकीचं आहे… तुम्ही विरोध करण्यासाठी मर्यादित शब्दांचा वापर करू शकता…’ सध्या सर्वत्र चिराग पासवान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत हिचा राजकारणातील प्रवास

कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख तर निर्माण केलीच आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. कंगना यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकावला आहे. प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकल्यामुळे कंगना चर्चेत आल्या.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत चिराग यांनी पहिल्या सिनेमात काम केलं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. सध्या चिराग पासवान यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Follow Us
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा