AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM मध्ये घोटाळा असल्याचा संशय, ‘या’ उमेदवाराच्या पत्नीची लक्षवेधी पोस्ट

EVM: मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन 99% चार्ज कसं? 'या' उमेदवाराच्या पत्नीला EVM मध्ये घोटाळा असल्याचा संशय... सध्या सर्वत्र तिच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चा...

EVM मध्ये घोटाळा असल्याचा संशय, 'या' उमेदवाराच्या पत्नीची लक्षवेधी पोस्ट
| Updated on: Nov 24, 2024 | 9:36 AM
Share

EVM: 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वात अकने चर्चा रंगत आहेत. अनेक सेलिब्रिटी निकालावर स्वतःचं स्पष्ट मत मांडत आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत EVM मध्ये घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा नवरा फहाद खान अणूशक्ती नगर येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. पण फहाद खान यांचा पराभव झाला आहे. नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा हिने सोशल मीडियावर लक्षवेधी पोस्ट केली आहे.

स्वरा भास्करचा पती फहाद अहमद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना अणुशक्ती नगर या जागेवर उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला. नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा हिची पोस्ट चर्चेत आली आहे.

एक्सवर (ट्विटर) स्वरा भास्कर हिने पोस्ट केली आहे. ‘मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन 99% चार्च कसं होऊ शकतं? यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे… अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?’ असा प्रश्न देखील स्वरा भास्कर हिने उपस्थित केला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

सांगायचं झालं तर, ‘अनुशक्ती नगर’ मतदारसंघात फहाद अहमद यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. सना मलिक यांचा विजय झाला आहे. सना मलिक या नवाब मलिक कन्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 128 जागांवर विजय मिळवला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आई झाल्यानंतर अभिनेत्रीने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. ‘वीरे दि वेडिंग’, ‘सरभरी’, ‘रांझना’, ‘तनु वेड्स मनु’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

स्वरा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री राजकारणावर देखील स्वतःचं स्पष्ट मत मांडत असते. ज्यामुळे स्वराला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.