AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Death : धर्मेंद्र परफेक्ट पती कधीच नव्हते पण… पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचं मोठं विधान

Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी मनातील खंत व्यक्त केली तेव्हा..., धर्मेंद्र कधीच चांगले पती होऊ शकले नाहीत, पण..., प्रकाश कौर यांचं मोठं वक्तव्य

Dharmendra Death : धर्मेंद्र परफेक्ट पती कधीच नव्हते पण... पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचं मोठं विधान
प्रकाश कौर
| Updated on: Dec 02, 2025 | 1:11 PM
Share

Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या निधनांतर देखील पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनि यांच्यात अलेला दुरावा समोर येत आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 27 नोव्हेंबर रोजी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. पण यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना उपस्थित नव्हत्या.. हेमा यांनी त्यांच्या घरी धर्मेंद्र यांच्यासाठी पूजेचं आयोजन केलं होतं.

सांगायचं झालं तर, 1980 मध्ये अनेक वाद झाल्यानंतर देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. ज्यामुळे प्रकाश कौर यांना फार मोठा धक्का बसला. तेव्हा प्रकाश कौर पहिल्यांदा आणि शेवटच्या व्यक्त झाल्या होत्या. चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटल्यानंतर प्रकाश कौर यांनी मनातील खंत व्यक्त केली होती.

एका मुलाखतीत प्रकाश कौर म्हणालेल्या, ‘धर्मेंद्र कधीच चांगले पती झाले नाही. पण ते एक उत्तम वडील आहे… धर्मेंद्र त्यांच्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात…’ हेमा मालिनी यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलेलं. ‘हेमाजी प्रचंड सुंदर आहेत, म्हणून कोणताही पुरूष त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो…’ यानंतर प्रकाश कौर यांनी कायम हेमा मालिनी यांच्यासोबत दुरावा ठेवला…

तर हेमा मालिनी यांनी देखील प्रकाश कौर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. प्रकाश कौर यांच्यासोबत कधी प्रतिस्पर्धा केली नाही का, ‘जर तुम्ही एखाद्यावर प्रचंड प्रेम करता आणि त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला प्रेम मिळत असेल तर, छोट्या – छोट्या गोष्टींची तक्रार का करायची… मी त्यांना (धर्मेंद्र) कधीच त्रास दिला नाही कारण मला सर्वकाही माहिती होतं…’

एवढंच नाही तर, प्रकाश कौर यांच्या कुटुंबातील कोणाचा तिरस्कार वाटतो का? असा प्रश्न देखील हेमा मालिनी यांना विचारण्यात आला, यावर नकार देत हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘मला कोणाचा तिरस्कार वाटत नाही. त्यामुळे मी आज आनंदी आहे… कोणाला त्रास देण्याचा काय फायदा, ज्यावर तुम्ही प्रचंड प्रेम करता… मी प्रकाश कौर यांच्याबद्दल देखील कधीच काही बोलत नाही, कारण मी त्याचं सन्मान करते…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.

Follow Us
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.