AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 Ending Explained: ना घरी, ना नवीन मिशन.. ‘धुरंधर 2’च्या क्लायमॅक्सचा अर्थ काय? दिग्दर्शकाकडून मोठी हिंट?

Dhurandhar 2 Ending Explained: 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये हमजाला घरी जाताना दाखवण्यात आलं आहे. परंतु तो घरात प्रवेश करत नाही आणि तिथून परतही जात नाही, मग नेमकं क्लायमॅक्समध्ये काय होतं, ते जाणून घ्या..

Dhurandhar 2 Ending Explained: ना घरी, ना नवीन मिशन.. 'धुरंधर 2'च्या क्लायमॅक्सचा अर्थ काय? दिग्दर्शकाकडून मोठी हिंट?
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 10:22 AM
Share

सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत.. सर्वत्र केवळ आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ याच चित्रपटाची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर 19 मार्च रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक सीन्स व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक सीन हा क्लायमॅक्सचा आहे. ‘धुरंधर 2’चा शेवट एका शांत आणि भावूक वळणावर होतो. रणवीर सिंहची भूमिका हमजा अली मजारी पाकिस्तानात त्याचं मिशन पूर्ण करून भारतात परत येतो. जसकीरत सिंह रंगी ही खरी ओळख घेऊन तो मायदेशी परततो.

या अत्यंत भावूक वळणावर या चित्रपटाचा शेवट होतो, ज्यामध्ये जसकीरत त्याच्या आई आणि बहिणीला घरापासून लांब उभा राहून बघत असतो. परंतु तो घरात जात नाही. तिथेच रस्त्यावर तो भावूक होऊन उभा राहतो. मग ‘धुरंधर 2’च्या या क्लायमॅक्सचा नेमका अर्थ काय होतो? हमजा त्याच्या घरी परत जातो की देशसेवेसाठी पुन्हा नव्या मिशनवर जातो? आदित्य धरने तिसऱ्या भागासाठी काही कथा राखून ठेवली आहे का, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात.

क्लायमॅक्सचा अर्थ काय?

आपलं मिशन पूर्ण करून हमजा भारतात परत येऊन अजय सन्यालला भेटतो. मात्र आपल्या ऑपरेशनबद्दल अधिकाऱ्यांना अधिकृतपणे माहिती देण्यापूर्वीच तो त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पठाणकोटला जातो. पगडी घातलेला जसकीरत दुरूनच त्याच्या आईला आणि बहिणीला पाहतो. तो त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर त्यांना न भेटताच तो माघारी फिरतो आणि निघून जातो. या क्लायमॅक्सच्या दृश्यात आदित्य धरने हमजाच्या आयुष्यातील बदल आणि त्याच्या मिशनची भावनिक किंमत काय होती, हे अधोरेखित केलं आहे. हमजा त्याच्या कुटुंबीयांच्या अगजी जवळ येऊनसुद्धा तो त्यांना भेटू शकत नाही. शिवाय, तेसुद्धा त्याच्याशिवाय आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे तो त्यांना न भेटताच निघून जाण्याचा निर्णय घेतो.

‘धुरंधर 3’ येणार?

जसकीरत त्याच्या कुटुंबाला न भेटता पुढे कुठे जातो किंवा तो कोणाला भेटतो, या प्रश्नाचं उत्तर या दुसऱ्या भागात मिळत नाही. दिग्दर्शक आदित्य धरने त्याच्या मुख्य पात्राचं भविष्य अनिर्णित ठेवलं आहे. यातून त्याने ‘धुरंधर 3’बद्दल संकेत दिले आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो. परंतु याबद्दलची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. आदित्यने त्याच्या या चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांनी आपापला अर्थ काढण्यासाठी खुला ठेवला आहे, असंही म्हणायला हरकत नाही. जसकीरतचं पुढे काय झालं असेल, हे ठरवण्याची जबाबदारी त्याने प्रेक्षकांवर सोडली आहे.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.