AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केलीच नव्हती? फोटोंवरून नेटकऱ्यांचा सवाल

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रंगपंचमीनिमित्त जे फोटो समोर आले, त्यातून नेटकऱ्यांनी असा अंदाज वर्तवला की ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांसोबत नव्हे तर पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबत वेगळी रंगपंचमी साजरी केली.

ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केलीच नव्हती? फोटोंवरून नेटकऱ्यांचा सवाल
बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2024 | 8:22 AM
Share

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबीयांशी जमत नसल्याचंही म्हटलं जात होतं. अशातच रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा बच्चन कुटुंबीयांचे फोटो समोर आले, तेव्हा अनेकांना असं वाटलं की सर्वकाही आलबेल आहे. मात्र थोड्या वेळानंतर नेटकऱ्यांनी एका गोष्टीचं निरीक्षण केलं. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात श्वेता नंदाने रंगपंचमीचे जे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यात कुठेच ऐश्वर्या दिसून आली नव्हती. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या यांच्या रंगपंचमीचे जे फोटो समोर आले, त्यात बच्चन कुटुंबीय कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केली नाही, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने होलिका दहन आणि त्यानंतर रंगपंचमीचेही काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये होलिका दहनच्या वेळी ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत दिसून आली होती. मात्र रंगपंचमीच्या फोटोंमधून ऐश्वर्या गायब होती. दुसरीकडे ऐश्वर्याचे जे फोटो समोर आले आहेत, त्यात ती मुलगी आराध्या आणि मित्रमैत्रिणींसोबत रंगपंचमी खेळताना दिसून येत आहे. यामध्ये अभिषेकसुद्धा तिच्यासोबत आहे. त्यामुळे हे दोन वेगवेगळे फोटो पाहून ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये अजूनही सर्वकाही ठीक नसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ऐश्वर्याचे वाद अभिषेकसोबत नसून बच्चन कुटुंबीयांसोबत असल्याच्या नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सासू जया बच्चन यांच्याशी ऐश्वर्याचं पटत नसल्याचं याआधीही अनेकदा समोर आलं होतं. आता रंगपंचमीनिमित्त पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांचा वाद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ऐश्वर्या-अभिषेकची रंगपंचमी

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...