AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केलीच नव्हती? फोटोंवरून नेटकऱ्यांचा सवाल

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रंगपंचमीनिमित्त जे फोटो समोर आले, त्यातून नेटकऱ्यांनी असा अंदाज वर्तवला की ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांसोबत नव्हे तर पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबत वेगळी रंगपंचमी साजरी केली.

ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केलीच नव्हती? फोटोंवरून नेटकऱ्यांचा सवाल
बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2024 | 8:22 AM
Share

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबीयांशी जमत नसल्याचंही म्हटलं जात होतं. अशातच रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा बच्चन कुटुंबीयांचे फोटो समोर आले, तेव्हा अनेकांना असं वाटलं की सर्वकाही आलबेल आहे. मात्र थोड्या वेळानंतर नेटकऱ्यांनी एका गोष्टीचं निरीक्षण केलं. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात श्वेता नंदाने रंगपंचमीचे जे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यात कुठेच ऐश्वर्या दिसून आली नव्हती. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या यांच्या रंगपंचमीचे जे फोटो समोर आले, त्यात बच्चन कुटुंबीय कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केली नाही, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने होलिका दहन आणि त्यानंतर रंगपंचमीचेही काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये होलिका दहनच्या वेळी ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत दिसून आली होती. मात्र रंगपंचमीच्या फोटोंमधून ऐश्वर्या गायब होती. दुसरीकडे ऐश्वर्याचे जे फोटो समोर आले आहेत, त्यात ती मुलगी आराध्या आणि मित्रमैत्रिणींसोबत रंगपंचमी खेळताना दिसून येत आहे. यामध्ये अभिषेकसुद्धा तिच्यासोबत आहे. त्यामुळे हे दोन वेगवेगळे फोटो पाहून ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये अजूनही सर्वकाही ठीक नसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ऐश्वर्याचे वाद अभिषेकसोबत नसून बच्चन कुटुंबीयांसोबत असल्याच्या नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सासू जया बच्चन यांच्याशी ऐश्वर्याचं पटत नसल्याचं याआधीही अनेकदा समोर आलं होतं. आता रंगपंचमीनिमित्त पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांचा वाद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ऐश्वर्या-अभिषेकची रंगपंचमी

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले