AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Genelia D’souza | अभिनयातून 10 वर्षे ब्रेक का घेतला? अखेर जिनिलियाने सांगितलं खरं कारण

जिनिलियाच्या मराठीतील पदार्पणाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या कमबॅकच्या प्रवासाविषयी उलगडून सांगितलं. त्याचप्रमाणे तिने कामातून एवढा मोठा ब्रेक का घेतला होता, यामागचंही कारण स्पष्ट केलं.

Genelia D'souza |  अभिनयातून 10 वर्षे ब्रेक का घेतला? अखेर जिनिलियाने सांगितलं खरं कारण
Ved MovieImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2023 | 4:10 PM
Share

मुंबई: अभिनेत्री जिनिलिया डिसूझाने तब्बल 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. ‘वेड’ या मराठी चित्रपटात तिने पती रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिका साकारली. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. रितेश – जिनिलियाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना आवडतेच. मात्र या जोडीला ऑनस्क्रीन पाहणंही चाहत्यांसाठी पर्वणी असते. जिनिलियाच्या मराठीतील पदार्पणाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या कमबॅकच्या प्रवासाविषयी उलगडून सांगितलं. त्याचप्रमाणे तिने कामातून एवढा मोठा ब्रेक का घेतला होता, यामागचंही कारण स्पष्ट केलं.

“चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद खूपच प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास होता, कारण जेव्हा तुम्ही 10 वर्षांनंतर परत येता, तेव्हा तुमच्या मनात विविध प्रश्न घोंघावत असतात. मी खरंच स्क्रीनवर उत्तम काम करू शकेन का, मला जी कामगिरी करायची आहे, त्यात मी सर्वोत्तम योगदान देऊ शकेन का, असे प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले होते”, असं जिनिलिया म्हणाली.

“जेव्हा तुमच्या कामाचं कौतुक होतं, तेव्हा ती खूप चांगली भावना असते. या यशाचा आनंद मी शेवटच्या क्षणापर्यंत घेणार आहे. हे काही काळापुरतं जरी असलं तरी वेडचा हा प्रवास माझ्या मनात कायम उत्सुकता आणि आनंद निर्माण करणारा असेल”, असं ती पुढे म्हणाली.

जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात जय हो आणि फोर्स 2 मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’मध्येच तिने मुख्य भूमिका साकारली. कुटुंबाकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहील ही दोन मुलं आहेत.

या ब्रेकविषयी जिनिलियाने सांगितलं, “मी माझी पावलं मागे घेतली कारण मला स्वत:साठी काहीतरी करायचं होतं. मला माझं कुटुंब हवं होतं. कुटुंबासाठी असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत चित्रपटांमध्येही काम करणं मला जमलं नसतं. त्याबद्दल मला आत्मविश्वास नव्हता. हा निर्णय माझा होता आणि त्यात मी आनंदी होते. एक गृहिणी, पत्नी आणि आई झाल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्त्वाच बरेच सकारात्मक बदल झाले. माझी प्रॉडक्शन कंपनी, म्युझिक कंपनीसुद्धा आहे. अभिनयाशिवाय मी वेगळंसुद्धा काहीतरी करू शकते, हे त्यातून सिद्ध झालं.”

“हा चित्रपट जर रितेशचा नसता तर कदाचित मी आणखी मोठा ब्रेक घेतला असता. त्यानेच मला या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी आग्रह केला”, असंही जिनिलियाने स्पष्ट केलं.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.