AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचा 40 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीच्या आरोपांवर स्पष्टच म्हणाला, “मी 2-4 लग्न..”

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुनीताने पुन्हा एका मुलाखतीत गोविंदावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला आहे. त्यावर आता पहिल्यांदाच गोविंदाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोविंदाचा 40 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीच्या आरोपांवर स्पष्टच म्हणाला, मी 2-4 लग्न..
Sunita Ahuja and GovindaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2026 | 12:12 PM
Share

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत खटके उडाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुनीताने गोविंदावर थेट विवाहबाह्य संबंधाचा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे वयाच्या 63 व्या वर्षी मुलाचं करिअर घडवण्याकडे, मुलीच्या लग्नाकडे लक्ष देण्याऐवजी गोविंदा अफेअरमध्ये गुंतल्याचं धक्कादायक वक्तव्य तिने केलं आहे. पत्नीच्य या सर्व आरोपांवर अखेर गोविंदाने आपली बाजू मांडली आहे. “मला एक सांगा, मी किती वेळा लग्न केलंय? माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन लग्न केले आहेत का”, असा सवाल गोविंदाने केला.

सुनीताबद्दल काय म्हणाला गोविंदा?

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा गोविंदाला सुनीताच्या आरोपांविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला, “मला एक सांगा, मी किती वेळा लग्न केलंय? माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन वेळा लग्न केलंय का? जे लोक इतक्या वेळा लग्न करतात, त्यांच्या पत्नी याविषयी काहीच बोलत नाहीत. त्या मस्त फिरतात, मजा करतात. फिल्म इंडस्ट्रीत अशा गोष्टींचं गॉसिप केलं जात नाही. या इंडस्ट्रीत मी क्वचितच एखाद्याला निष्कलंक पाहिलंय.” यावेळी गोविंदाने असंही सांगितलं की त्याची पत्नी आणि पुतण्या कृष्णा अभिषेक यांचा त्याच्याविरुद्ध वापर केला जात आहे.

“कृष्णा अभिषेकचे टीव्ही शो पाहिलात तर लेखक त्याला माझा अपमान करणाऱ्या गोष्टी बोलायला लावतात. मी त्यालासुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की, माझा अपमान करण्यासाठी तुझा वापर केला जातोय, तू सावध राहा. जेव्हा मी कृष्णाला इशारा दिला, तेव्हा सुनीता चिडली. मला कळत नाही की हे लोक कधी एकमेकांवर रागावतात आणि कधी ठीक असतात. मी तर अत्यंत साधा माणूस आहे”, असं गोविंदाने स्पष्ट केलं.

गोविंदाने त्याच्या मुलाचं करिअर घडवायला मदत केली नाही, असाही आरोप सुनीताने केला होता. त्यावर उत्तर देताना गोविंदा म्हणाला, “मी माझ्या क्षमतेनुसार काम करतोय. मी निर्माते किंवा दिग्दर्शकांशी माझ्या मुलांबद्दल बोलत नाही. ही इंडस्ट्री माझं कुटुंब आहे. जिथे मी पैसा आणि प्रसिद्ध कमावतो, त्यामुळे मी तिला कलंकित करू इच्छित नाही. पण या इंडस्ट्रीत सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे, कारण या गोष्टी विनाकारण घडत नाहीत. एक कट रचला जातोय. लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या आयुष्यात अशा समस्या निर्माण करू नका, ज्यामुळे मला आणि विशेषत: माझ्या कुटुंबाला दबावाखाली राहावं लागेल.”

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.