AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini | सोशल मीडियावर धर्मेंद्र यांनी माफी मागितल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांना चिंता होती, पण…’

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाला आजही करावी लागते तडजोड, हेमा मालिनी यांचं वक्तव्य समोर, धर्मेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींवर असलेलं प्रेम व्यक्त करतात पण...

Hema Malini | सोशल मीडियावर धर्मेंद्र यांनी माफी मागितल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, 'त्यांना चिंता होती, पण...'
| Updated on: Jul 10, 2023 | 10:23 AM
Share

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींना धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने स्वीकारलेलं नाही. हेमा मालिनी आजही तडजोड करत आयुष्य जगत असतात. देओल कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात हेमा मालिनी यांना निमंत्रण नसतं. नुकताच अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली लग्नाच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसल्या नाहीत. पण अभिनेत्री ईशा देओल हिने मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून करण याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

अखेल लग्न सोहळा पार पडल्यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून हेमा मालिनी आणि दोन मुली ईशा – अहाना यांची माफी मागितली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं. मुलींना चांगले जोडीदार मिळतील की नाही, या चिंतेत कायम धर्मेंद्र असायचे.. असं हेमा मालिनी म्हणाल्या.

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘माझ्या दोन्ही मुलींवर चांगले संस्कार झाले आहेत. धर्मेंद्र कायम आमच्या सोबत होते. ते कायम म्हणायचे मुलींचं लग्न योग्य वयात झालं पाहिजे. तेव्हा मी त्यांना दिलासा द्यायची आणि म्हणायची होईल… योग्य वेळी योग्य मुलगा येईल आणि त्यांचं लग्न होईल. देव आणि गुरुंच्या आशीर्वादामुळे सर्व काही शक्य झालं..’ असं हेमा मालिनी म्हणाल्या.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. महत्त्वाचं म्हणजे, प्रकाश कौर धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हत्या. यामुळे धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं.

धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेते लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात धर्मेंद्र यांच्या शिवाय, जया बच्चन, शबाना अझमी, रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते आजही धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.