Hema Malini: ते खरंच गेलेत…? धर्मेंद्र यांच्या आठवणीत आजही हेमा मालिनी रडतात…
Hema Malini: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर हेमा मालिनी पूर्णपणे खचल्या आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधला तीन महिने झाले आहेत. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळली… दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. सांगायचं झालं तर, BAFTA अवॉर्ड सेरेमनीत धर्मेंद्र यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हेमा मालिनी यांनी ‘मनाला स्पर्श करणारा क्षण अशी प्रतिक्रिया दिली.’ यावेळी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत व्यतीत केलेल्या दिवसांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा रंगली आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र त्यांच्या काळातील सर्वात व्यक्त अभिनेत्यांपैकी एक होते. शुटिंग सुरु असल्यामुळे अधिकचा प्रवास आमच्यासाठी शक्य नव्हता. त्यामुळे आम्ही एकत्र सिनेमा साईन करायचो. ज्यामुळे एकत्र वेळ घालवता येईल.
धर्मेंद्र यांच्या निधनावर देखील हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘मला प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते… मी कामय स्वतःलाच प्रश्न विचारत असते की, खरंच ते गेले आहेत? माझी आणि त्यांची पुन्हा भेट कधी होईल?’ सांगायचं झालं तर, 1980 मध्ये समाजाच्या विरोधात जात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. त्यानंतर दोघांनी दोन मुली ईशा आणि अहाना यांचं जगात स्वागत केलं…
धर्मेंद्र यांच्या आवडत्या सिनेमांबद्दल देखील हेमा मालिनी यांना प्रतिक्रिया दिली. ‘त्यांना (धर्मेंद्र) ‘चुपके चुपके’ सिनेमा प्रचंड आवडायचा. पण दोघांचा आवडता सिनेमा ‘शोले’ होता… कारण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आम्ही आयुष्यातील खास क्षण अनुभवले होते… मी त्यांचे सगळे सिनेमे पाहिलेले नाहीत. पण वेळ मिळताच त्यांचे सर्व सिनेमे पाहणार…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या…
एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबियांनी वेगळ्या शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावर देखील एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं. यावर आमच्यात बोलणं झालं होतं.. असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. हेमा मालिनी यांनी मुंबई, दिल्ली आणि मथुरा येथे प्रार्थना सभांचे आयोजन केलं होतं, तर सनी देओल आणि त्याच्या कुटुंबियांनी मुंबईतील निवासस्थानी वडिलांसाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती.
