AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेकांना न भेटताही दोन्ही कुटुंबांना कसे सांभाळायचे धर्मेंद्र; ईशाने स्पष्टच सांगितले होते,”मला माझे भाऊ कधीही…”

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले तरी, त्यांची दोन्ही कुटुंबे कशी सांभाळली हा प्रश्न अनेकांना पडतो. हेमा मालिनींना फक्त प्रेम हवे होते आणि त्यांनी धर्मेंद्र यांच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा केली नाही. धर्मेंद्र यांनी दोन्ही कुटुंबाची बाजू कशी हाताळली याबाबतचा खुलासा एका मुलाखतीत ईशा देओलने केला आहे.

एकमेकांना न भेटताही दोन्ही कुटुंबांना कसे सांभाळायचे धर्मेंद्र; ईशाने स्पष्टच सांगितले होते,मला माझे भाऊ कधीही...
Dharmendra Family ManImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2025 | 1:16 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. देओल कुटुंबाने अलीकडेच त्यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांचे कुटुंब आणि शाहरुख खान ,सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यावेळी खरंतर सगळेच त्यांच्या आठवणीत भावुक झालेले दिसले. दरम्यान त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा राहिले आहे. विशेषत: धर्मेंद्रने 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांचे आधीच प्रकाश कौरशी लग्न झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना चार मुले होती. त्यामुळे त्यांचे दुसरे लग्न हा वादाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे.

दोन्ही कुटुंबांची जबाबदारी वेगवेगळी सांभाळण्याची जबाबदारी

धर्मेंद्र यांचे दुसऱ्या लग्नानंतर अर्थातच दोन कुटुंबे झाली होती. पण हेमा मालिनी या कधीही प्रकश कौर यांना भेटल्या नव्हत्या किंवा त्यांची तसे चांगले संबंध निर्माण झाले नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची जबाबदारी वेगवेगळी सांभाळण्याची जबाबदारी धर्मेंद्र यांच्यावर आली होती. मग ते दोन्ही कुटुंबांना कसे सांभाळायचे? हा प्रश्न नक्कीच अनेकदा चाहत्यांना पडलेला. असाच प्रश्न एका मुलाखतीत धर्मेंद्र आणि हेमा यांची मुलगी ईशाला विचारण्यात आला होता.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबात हस्तक्षेप करायचा नव्हता.

2022 च्या एका जुन्या मुलाखतीत, ईशा देओल तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत सोबत उपस्थित होती. त्या मुलाखतीदरम्यान, तिने सांगितले की तिचे वडील त्यांचे दोन्ही कुटुंब इतके चांगले कसे काय सांभाळू शकतात हा प्रश्न पडायचा. लग्नानंतर हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्यापासून नेहमीच वेगळ्या राहिल्या होत्या. कारण हेमा यांना धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबात हस्तक्षेप करायचा नव्हता. पण तरीही धर्मेंद्र यांनी दोन्ही कुटुंब खूप चांगल्या प्रकारे हाताळली.

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्याकडून फक्त ही गोष्ट हवी होती

राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “एक वेळ अशी आली जेव्हा मला त्यांना सांगावे लागले की, आता तुम्ही माझ्याशी लग्न करा. आपण असे पुढे जाऊ शकत नाही. मला माहित होते की काही समस्या असतील, पण मी त्याच्यांकडून दुसरे काहीही अपेक्षा करत नव्हते आणि नाही. मला फक्त प्रेम हवं होतं. ते नेहमीच माझ्यासोबत असायचे, मग मला आणखी काय हवं होतं? मला त्यांच्याकडून मालमत्ता, पैसा किंवा इतर काहीही नको आहे. मला फक्त थोडं प्रेम हवं आहे. बस एवढेच.”

धर्मेंद्रने दोन्ही कुटुंबांना सुंदरपणे सांभाळले

जेव्हा ईशाला तिचे वडील आणि तिचे भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती, “आम्ही कुटुंब म्हणून खूप खाजगी आहोत. मला माझे भाऊ कधीही वेगळे वाटले नाही.ते मला खूप आवडतात. ते नेहमीच माझ्यासाठी उभे राहिले आहेत आणि माझे वडील नेहमीच माझ्यासाठी आहेत. माझ्या वडिलांबद्दल मला जे आवडते ते म्हणजे ते इतक्या मोठ्या मनाची व्यक्ती आहेत. तसेच ते दोन्ही बाजू सुंदरपणे सांभाळू शकतात. मी त्यांना याचे सगळे श्रेय देते.”

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.