AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा

Janhvi Kapoor on Periods and Nature of Men: माहिलांच्या मासिक पाळीकडे तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा, म्हणाली, 'पुरुषांना मासिक पाळी आली असती तर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवीच्या वक्तव्याची चर्चा...

'पुरुषांना मासिक पाळी आली असती तर...', तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
Follow us
| Updated on: Apr 19, 2025 | 1:11 PM

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मासिक पाळीबद्दल स्वतःचं मत मांडलं आहे. आता अभिनेत्री जान्हवी कपूर हिने देखील मासिक पाळीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी जान्हवीने अशा पुरुषांवर निशाणा साधला आहे, जे माहिलांच्या मासिक पाळीकडे तिरस्काराने दुर्लक्ष करतात. पुरुषांमध्ये मासिक पाळीत होणारा त्रास सहन करण्याची शक्ती नाही… जान्हवीने नुकताच दिलेल्या मुलाखतीत मासिक पाळीच्या महिलांना होणाऱ्या वेदना आणि तिरस्काराने पुरुष देत वागणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

जान्हवी म्हणाली, ‘मासिक पाळी दरम्यान महिलांच्या वागणुकीत बदल होतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत देखील बदलते. मासिक पाळी दरम्यान महिला भांडणं करत असतील तर, ते दिवस महिलांसाठी फार वेदनादायी असतात. त्यामुळे त्या दिवसांमध्ये पुरुषांनी विचार करुन बोलायला हवं. कारण त्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना फार तिव्र असतात.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘काही पुरुष मासिक पाळीकडे तिरस्काराने दुर्लक्ष करतात. मी ठामपणे सांगू शकते की, पुरुष मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना आणि मूड स्विंग एक मिनिटासाठी देखील सहन करु शकणार नाहीत. जर पुरुषांना मासिक पाळी आली असती तर कोणत्या प्रकारचे अणुयुद्ध झालं असतं कोणास ठाऊक? जान्हवीच्या या कमेंटला सोशल मीडियावर महिलांचा पाठिंबा मिळाला आहे.’ सध्या सर्वत्र जान्हवी कपूरच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

सांगायचं झालं तर, याआधी देखील जान्हवीने मासिक पाळीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. मासिक पाळी सुरु असताना मी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करते… असं अभिनेत्री म्हणाली होती. ‘मासिक पाळी सुरु असताना मी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करते. सुरुवातीला माझ्या स्वभावामुळे ती व्यक्ती देखील हैराण व्हायची. पण आता माझ्या बॉयफ्रेंडला देखील सर्व गोष्टी कळल्या आहेत. त्यामुळे तो मला समजून घेतो…’

जान्हवीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय जान्हवी ‘परम सुंदरी’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर अभिनेत्री तेलुगू सिनेमा ‘पेद्दी’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO.