AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल

अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्याविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. हे प्रकरण अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले आहे.

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल
| Updated on: Sep 11, 2024 | 9:38 AM
Share

बॉलीवूडमधील विख्यात लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. कंगना राणौत या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत किंवा वादात सापडलेल्या असतात. आता पुन्हा एका मोठ्या कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत कंगना यांचा वाद झाला असून ते प्रकरण कोर्टात गेलं होतं. जावेद अख्तर यांनी कंगन यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रारही दाखल केली होती. त्याप्रकरणाची सुनावणी आता वांद्रे येथील विशेष न्यायालयात होणार आहे. कंगना राणौत आता खासदार झाल्याने , त्या ज्या प्रकरणांमध्ये पक्षकार आहे ती प्रकरणे अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहेत.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगाना यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक जिंकून त्या खासदार बनल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कोर्ट हे खासदार व आमदारांचा समावेश असलेली प्रकरणं हाताळतं. मुंबईतील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने अंधेरी कोर्टातील भाजप खासदाराशी संबंधित सर्व खटले या विशेष दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

2021 साली सप्टेंबर महिन्यात कंगना राणौत यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हेगारी धमकीचा आरोप केला होता. कंगना यांचा सहकलाकार असलेला हृतिक रोशनशी तिचा झालेला वाद जगजाहीर आहे. या सार्वजनिक वादानंतर अख्तर यांनी कंगना व त्यांची बहीण यांना त्यांच्या जुहूतील निवासस्थानी बोलावले , त्यांना धमकावले आणि लेखी माफी मागण्यास भाग पाडले. असा आरोप कंगना यांनी केला होता. तेव्हा हृतिक आणि कंगना त्यांच्या काही ई-मेलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

तर जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि माझ्या प्रतिष्ठेला हानि पोहोचवली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगना यांनी अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावरूनही अख्तर यांनी आरोप केला होता. आता हे प्रकरण वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले असून तेथे सुनावणी होईल.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.