AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल

अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्याविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. हे प्रकरण अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले आहे.

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल
| Updated on: Sep 11, 2024 | 9:38 AM
Share

बॉलीवूडमधील विख्यात लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. कंगना राणौत या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत किंवा वादात सापडलेल्या असतात. आता पुन्हा एका मोठ्या कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत कंगना यांचा वाद झाला असून ते प्रकरण कोर्टात गेलं होतं. जावेद अख्तर यांनी कंगन यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रारही दाखल केली होती. त्याप्रकरणाची सुनावणी आता वांद्रे येथील विशेष न्यायालयात होणार आहे. कंगना राणौत आता खासदार झाल्याने , त्या ज्या प्रकरणांमध्ये पक्षकार आहे ती प्रकरणे अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहेत.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगाना यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक जिंकून त्या खासदार बनल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कोर्ट हे खासदार व आमदारांचा समावेश असलेली प्रकरणं हाताळतं. मुंबईतील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने अंधेरी कोर्टातील भाजप खासदाराशी संबंधित सर्व खटले या विशेष दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

2021 साली सप्टेंबर महिन्यात कंगना राणौत यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हेगारी धमकीचा आरोप केला होता. कंगना यांचा सहकलाकार असलेला हृतिक रोशनशी तिचा झालेला वाद जगजाहीर आहे. या सार्वजनिक वादानंतर अख्तर यांनी कंगना व त्यांची बहीण यांना त्यांच्या जुहूतील निवासस्थानी बोलावले , त्यांना धमकावले आणि लेखी माफी मागण्यास भाग पाडले. असा आरोप कंगना यांनी केला होता. तेव्हा हृतिक आणि कंगना त्यांच्या काही ई-मेलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

तर जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि माझ्या प्रतिष्ठेला हानि पोहोचवली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगना यांनी अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावरूनही अख्तर यांनी आरोप केला होता. आता हे प्रकरण वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले असून तेथे सुनावणी होईल.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत