AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल

अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्याविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. हे प्रकरण अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले आहे.

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल
| Updated on: Sep 11, 2024 | 9:38 AM
Share

बॉलीवूडमधील विख्यात लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. कंगना राणौत या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत किंवा वादात सापडलेल्या असतात. आता पुन्हा एका मोठ्या कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत कंगना यांचा वाद झाला असून ते प्रकरण कोर्टात गेलं होतं. जावेद अख्तर यांनी कंगन यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रारही दाखल केली होती. त्याप्रकरणाची सुनावणी आता वांद्रे येथील विशेष न्यायालयात होणार आहे. कंगना राणौत आता खासदार झाल्याने , त्या ज्या प्रकरणांमध्ये पक्षकार आहे ती प्रकरणे अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहेत.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगाना यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक जिंकून त्या खासदार बनल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कोर्ट हे खासदार व आमदारांचा समावेश असलेली प्रकरणं हाताळतं. मुंबईतील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने अंधेरी कोर्टातील भाजप खासदाराशी संबंधित सर्व खटले या विशेष दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

2021 साली सप्टेंबर महिन्यात कंगना राणौत यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हेगारी धमकीचा आरोप केला होता. कंगना यांचा सहकलाकार असलेला हृतिक रोशनशी तिचा झालेला वाद जगजाहीर आहे. या सार्वजनिक वादानंतर अख्तर यांनी कंगना व त्यांची बहीण यांना त्यांच्या जुहूतील निवासस्थानी बोलावले , त्यांना धमकावले आणि लेखी माफी मागण्यास भाग पाडले. असा आरोप कंगना यांनी केला होता. तेव्हा हृतिक आणि कंगना त्यांच्या काही ई-मेलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

तर जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि माझ्या प्रतिष्ठेला हानि पोहोचवली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगना यांनी अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावरूनही अख्तर यांनी आरोप केला होता. आता हे प्रकरण वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले असून तेथे सुनावणी होईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.