AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावेद अख्तर यांनी घेतली सोनम रघुवंशीची बाजू; म्हणाले, महिलांना जिवंत जाळतात तेव्हा..

Javed Akhtar On Sonam Raghuvanshi- Muskan Rastogi case: समाज निर्लज्ज आहे, जो..., सोनम रघुवंशीची बाजू घेत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,"महिलांना जिवंत जाळतात तेव्हा..", सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा...

जावेद अख्तर यांनी घेतली सोनम रघुवंशीची बाजू; म्हणाले, महिलांना जिवंत जाळतात तेव्हा..
फाईल फोटो
| Updated on: Jul 01, 2025 | 11:42 AM
Share

Javed Akhtar On Sonam Raghuvanshi- Muskan Rastogi case: देशातील वादग्रस्त प्रकरण राजा – सोनम रघुवंशीने स्वतःचा गुन्हा कबूल केला तेव्हा अनेकांनी सोनम हिच्यावर टीका केली. लग्नाच्या काही दिवसांनंतर सोनम हिने पती राजा रघुवंशी याची हत्या केली आणि स्वतः गायब झाली. सोनम हिने स्वतःचा गुन्हा कबूल केल्यानंतर अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, प्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तर यांनी यावर स्वतःचं मत मांडलं आहे.

जावेद अख्तर म्हणाले, सोनम हिला कोणी विचारलं का तिला हे लग्न करायचं होतं नव्हतं… लहान शहरांमध्ये राहणाऱ्या मुलींसाठी आई – वडिलांना आपल्या आवडत्या मुलांबद्दल सांगणं सोपं असतं का, मुलीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे? असं मुली सांगू शकत नाहीत…

सोनम रघुवंशी आणि मुस्कान रस्तोगी प्रकरणावर जावेद अख्तर म्हणाले, ‘या दोन महिलांना स्वतःच्या नवऱ्यांना जीवे मारलं आणि समाजाला मोठा धक्का बसला. पण समाज तेव्हा गप्प राहतो जेव्हा महिलांना जिवंत जाळलं जातं आणि त्यांची मारहाण केली जाते.

समाजाच्या दुहेरी मानसिकतेवर देखील जावेद अख्तर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाज निर्लज्ज आहे. जो पुरुषांनी महिलांवर केलेल्या अत्याचारांवर गप्प राहतो पण महिला हिंसाचार करतात तेव्हा लगेच प्रतिक्रिया देतो… असं देखील जावेद अख्तर म्हणाले.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या सर्वत्र जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

दोन्ही प्रकरणात काय झालं?

राजा रघुवंशी याची हत्या – पत्नी सोनम रघुवंशी हिने प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून लग्नाच्या काही दिवसांनंतर नवऱ्याला मारलं. राजा रघुवंशी याचा मृतदेह मेघालय मधील चेरापुंजी याठिकाणी एका धबधब्याच्या जवळ सापडले. राजा रघुवंशी यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली होती.

मुस्कान रस्तोगी प्रकरण- मुस्कानने तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली आणि शरीराचे तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये लपवले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.