AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांना लग्नाचा पश्चात्ताप? थेट म्हणाल्या “नातीने लग्नच करू नये..”

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नसंस्थेबद्दल आपले मोकळे विचार मांडले आहेत. लग्न ही फार जुनी परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर नात नव्याने लग्न करावं अशी माझी इच्छा नाही, असंही त्या म्हणाल्या.

जया बच्चन यांना लग्नाचा पश्चात्ताप? थेट म्हणाल्या नातीने लग्नच करू नये..
Jaya Bachchan and Navya Naveli NandaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 01, 2025 | 9:04 AM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. नुकत्याच त्या मुंबईतील ‘वी द वुमेन’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी लग्नाबाबत स्पष्ट मत मांडलं. लग्न ही परंपरा ‘आऊटडेटेड’ (जुनी) असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर नात नव्या नवेली नंदाने लग्न करावं अशी माझी इच्छा नाही, असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या. नव्या ही जया आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे.

लग्न ही जुनी परंपरा आहे, असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न जया बच्चन यांना या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर त्या म्हणाल्या, “हो अर्थात. नव्याने लग्न करावं अशी माझी इच्छा नाही. मी आता आजी आहे. नव्या काही दिवसांनी 28 वर्षांची होईल. मी आता इतकी म्हातारी झाले आहे की तरुण मुलींना मुलांच्या संगोपनाबाबत मी सल्ले देऊ शकत नाही. गोष्टी फार बदलल्या आहेत आणि आजकाल लहान मुलं इतकी हुशार आहेत की तुम्हालाही मात देतील.”

या मुलाखतीत बोलताना पुढे जया बच्चन यांनी लग्नाची तुलना ‘दिल्लीच्या लाडू’शी केली. त्या म्हणाल्या की “लग्नाची वैधता तुमच्या नातेसंबंधाची परिभाषा मांडत नाही. लग्न म्हणजे दिल्लीच्या लाडूंसारखं आहे. ते खाल्लं तरी त्रास आहे आणि नाही खाल्लं तरी त्रास आहे. त्यामुळे फक्त आयुष्याचा आनंद घ्या.”

याच कार्यक्रमात जया बच्चन यांनी पापाराझींवरही जोरदार टीका केली. “हे जे बाहेर ड्रेन पाइप टाइट घाणेरडे पँट घालून हातात मोबाइल घेऊन उभे असतात. त्यांना असं वाटतं की ते तुमचा फोटो आणि व्हिडीओ क्लिक करू शकतात आणि ते कशा पद्धतीचे कमेंट्स पास करत असतात. कुठून येतात ही लोकं”, अशा शब्दांत त्यांनी पापाराझी कल्चरला फटकारलं आहे.

जया बच्चन यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. अभिषेकने अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केलं असून त्यांना आराध्या ही मुलगी आहे. तर श्वेताने बिझनेसमन निखिल नंदाशी लग्न केलं असून त्यांना नव्या ही मुलगी आणि अगस्त्य हा मुलगा आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक