AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेत जया बच्चन यांचा संताप, ‘या’ कारणामुळे सरकारवर गळचेपी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Jaya Bachchan: असंख्य लोकांसाठी राज्यसभेत जया बच्चन यांनी उठवला आवाज, संताप व्यक्त करत सरकारवर गळचेपी केल्याचा आरोप, काय आहे कारण? जया बच्चन कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

राज्यसभेत जया बच्चन यांचा संताप, 'या' कारणामुळे सरकारवर गळचेपी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
| Updated on: Feb 12, 2025 | 1:12 PM
Share

अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी राज्यसभेत दमदार भाषण दिली आणि भारतील सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केली. जया बच्चन यांनी यावेळी भारतीय सरकारवर गंभीर आरोप केले आहे. सरकारचं फिल्म इंडस्ट्रीकडे लक्ष नसल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. ‘सरकारचं लक्ष नसल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीची हत्या होत आहे… सरकारने दया करुन इंडस्ट्रीची गळचेपी करण थांबवावं…’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या. शिवाय नुकतात सादर झालेल्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.

नुकताच दिलेल्या भाषणात जया बच्चन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘यावेळी बजेटमध्ये फिल्म इंडस्ट्रीसाठी कोणतीच तरतूद नाही. फिल्म इंडस्ट्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सिंगल स्क्रिन थिएटर्सची हत्या होत आहे आणि एक दिवस त्यांना टाळे लागतील…’

जया बच्चन म्हणाल्या, यापूर्वीच्या सरकारने अशाच चुका केल्या होत्या पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज जीएसटीची गोष्ट बाजूला राहूद्या… सर्व सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद होत आहेत. प्रेक्षकांनी देखील थिएटर्सकडे पाठ फिरवली आहे. कारण सर्व गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.’

‘सरकारने सादर केलेलं बजेट पाहून फिल्म इंडस्ट्रीकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. इंडस्ट्रीमध्ये एका दिवसाच्या मजूरीवर काम करणारे देखील अनेक लोक आहेत. सिनेमे देशाला जोडून ठेवतात, एकत्र आणतात… असं असताना सरकारने इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष केलं आहे.’

पुढे जया बच्चन म्हणाल्या, ‘आज याठिकाणी फिल्म इंडस्ट्रिच्या वतीने बोलत आहे. त्यांच्याकडून विनंती करत आहे. कृपा करुन इंडस्ट्रीवर दया करा आणि इंडस्ट्रीला वाचव… ज्या प्रकारे बजट सादर झालं आहे, ते पाहिल्यानंतर इंडस्ट्री नष्ट होईल असं दिसत आहे. इंडस्ट्रीला कायम लक्ष्य केलं जातं….’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या आहेत.

सांगायचं झालं तर, जया बच्चन कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर जया बच्चन स्वतःचं परखड मत मांडत असतात. ज्यामुळे जया बच्चन यांच्यावर टीका देखील होते. शिवाय  त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.