मुंबई- 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्री जुही चावलाने आपल्या सौंदर्याच्या आणि दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये जुहीचं नाव घेतलं जायचं. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामुळे जुहीला प्रसिद्धी मिळाली. आजही तिची लोकप्रियता कायम आहे. जुहीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र एकेकाळी तिला तिच्या लग्नामुळे लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. जुहीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊयात..