AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!

अभिनेत्री जुही चावलाने करिअरच्या शिखरावर असताना बिझनेसमन जय मेहताशी लग्न केलं. हे लग्न तिने काही काळापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र जेव्हा लोकांना तिच्या लग्नाविषयी समजलं, तेव्हा अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Juhi Chawla with husband Jay MehtaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2024 | 9:32 AM
Share

अभिनेत्री जुही चावलाने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलंय. 1984 मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकलेल्या जुहीने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष राज्य केलं. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबतची तिची जोडी विशेष हिट झाली होती. 1986 मध्ये तिने ‘सल्तनत’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. जुही नेहमी वादापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करते. मात्र लग्नामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. दमदार अभिनय आणि सौंदर्य यांमुळे इंडस्ट्रीत जुहीवर अनेकजण फिदा होते. 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट जबरदस्त हिट झाल्यानंतर जुहीने मागे वळून पाहिलंच नाही. मात्र करिअरच्या शिखरावर असतानाच तिने तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या बिझनेसमन जय मेहताशी लग्न केलं.

जय मेहता जेव्हा पहिल्यांदा जुहीला भेटले होते, तेव्हा त्यांची पत्नी सुजाता बिर्ला यांचं एका प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं होतं. 1992 मध्ये ‘कारोबार’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी जुही आणि जय यांची भेट घडवून आणली होती. राकेश आणि जय हे खूप चांगले मित्र आहेत. शूटिंगदरम्यान दोघांची अनेकदा भेट झाली होती. जुहीला जेव्हा जय मेहता यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल समजलं, तेव्हा तिने सहानुभूती दर्शवली. त्याच काळात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. या दोघांनी जेव्हा लग्नाचा विचार केला तेव्हा जुहीच्या आईचं एका कार अपघातात निधन झालं. या घटनेमुळे जुही पूर्णपणे खचली होती. या दु:खातून बाहेर पडण्यात जय यांनी जुहीची खूप मदत केली. अखेर 1995 मध्ये दोघांनी लग्न केलं. या दोघांना जान्हवी ही मुलगी आणि अर्जुन हा मुलगा आहे.

जुहीने काही वर्षांपर्यंत तिचं लग्न लपवून ठेवलं होतं. करिअरवर कोणताही प्रभाव पडू नये म्हणून तिने लग्नाचा खुलासा केला नव्हता. जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जय मेहता हे मेहता ग्रुपचे मालक आणि प्रसिद्ध बिझनेसमन आहेत. जुहीच्या लग्नाबद्दल जेव्हा लोकांना समजलं, तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. पैशांसाठी तिने म्हाताऱ्याशी लग्न केलं, असे टोमणेही मारले गेले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.