AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan | “तू तर फोनवर भीक मागू लागला”, मुख्यमंत्र्यांना फोन केल्याने अभिनेत्याने शाहरुखवर साधला निशाणा

आसाममध्ये पठाणविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरबाहेर निदर्शनं केली. त्यानंतर शाहरुखने आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना फोन करून त्याबद्दल काळजी व्यक्त केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती.

Pathaan | तू तर फोनवर भीक मागू लागला, मुख्यमंत्र्यांना फोन केल्याने अभिनेत्याने शाहरुखवर साधला निशाणा
Shah Rukh KhanImage Credit source: Youtube
| Updated on: Jan 23, 2023 | 7:52 AM
Share

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. आसाममध्ये पठाणविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरबाहेर निदर्शनं केली. त्यानंतर शाहरुखने आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना फोन करून त्याबद्दल काळजी व्यक्त केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती. ‘पठाणविरोधात आसाममध्ये सुरू असलेल्या विरोधाबाबत शाहरुखने फोन करून चिंता व्यक्त केली. त्यावर मी याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं’, असं हिमंत बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण प्रकरणावरून आता एका अभिनेत्याने किंग खानवर निशाणा साधला आहे.

‘शाहरुख खानने आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना मध्यरात्री 2 वाजता फोन केला आणि राज्यात पठाण प्रदर्शित करण्यासाठी मदतीची मागणी केली. एसआरके भाऊ, तू तर म्हणाला होता की तू हवेनं अजिबात डगमगणार नाही. तू तर आता फोनवर भीक मागू लागलास. आता समजलं का की उद्धट होणं किती हानीकारक असतं’, अशी टीका संबंधित अभिनेत्याने शाहरुखवर केली. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर खान आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गुवाहाटीमधील थिएटरबाहेर ‘पठाण’विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शाहरुखचे पोस्टरही जाळण्यात आले. याविषयी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना विचारलं असता ‘कोण शाहरुख खान, मी त्याला ओळखत नाही’ अशी अजब प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेच्या काही तासांनंतर त्यांनी शाहरुखविषयी एक ट्विट केलं. शाहरुखने मध्यरात्री 2 वाजता फोन केल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

‘बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मला फोन केला होता आणि आज पहाटे 2 वाजता आमचं बोलणं झालं. त्याच्या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये घटलेल्या घटनेबद्दल त्याने चिंता व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं आश्वासन मी शाहरुखला दिलं. याप्रकरणी चौकशी करून कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खात्री करू’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.