AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut: कंगना आर्थिक संकटात, विकावा लागला मुंबईतला बंगला; कारण काय?

कंगना राणौत नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ज्याच्यामुळे अभिनेत्री अडचणीत येत. सध्या तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहे. या सिनेमामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज न झाल्यामुळे तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हे या अभिनेत्रीने सांगितले.

Kangana Ranaut: कंगना आर्थिक संकटात, विकावा लागला मुंबईतला बंगला; कारण काय?
| Updated on: Sep 18, 2024 | 9:01 PM
Share

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. कंगना राणौतने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाविषयी बरेच काही सांगितले. यापैकी एक म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना आपला बंगला विकावा लागला. नुकतीच बातमी आली होती की, कंगनाने मुंबईतील तिचा पाली हिल बंगला विकण्याची योजना आखली आहे.  इमर्जन्सी चित्रपटासाठी तिने आपली सर्व संपत्ती गुंतवली असल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील बंगला विकला

कंगनाती ही मुंबईतील मालमत्ता तेव्हा चर्चेत आली होती. जेव्हा मुंबई महापालिकेने त्या बंगल्यावर तोडक कारवाई केली होती. 2020 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्याचा काही भाग पाडला होता. जेव्हा कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी तिचा वाद झाला होता. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात तिचा बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला. बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा बीएमसीने केला होता आणि त्यामुळे तो पाडण्यात आला. तोडफोडीनंतर कंगनाला 2 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती जी तिने घेण्यास नकार दिला.

2020 मध्ये कंगनाने वांद्रे येथील पाली हिल भागातील तिची बहुमजली मालमत्ता 32 कोटी रुपयांना विकल्याचे समोर आले होते. याबाबत अभिनेत्री म्हणाली की, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्यामुळे तिचे पैसे अडकले असल्याने तिला हे करावे लागले.

कंगनाने या मालमत्तेचा वापर तिच्या निर्मिती कंपनी ‘मणिकर्णिका फिल्म्स’साठी कार्यालय म्हणून केला असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर अभिनेत्री म्हणाली, इमर्जन्सी हा माझा चित्रपट होता जो रिलीज होणार होता, त्यामुळे या चित्रपटासाठी मी माझी संपत्ती पणाला लावली आणि आता तो सिनेमा अजून रिलीज झालेला नाही.”

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....