AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन, कंगणा राणौत हिची मोठी घोषणा; कारण काय?

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत तिच्या निर्भिड वक्तव्यांसाठी, स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी कंगान आता एका नव्या क्षेत्रात उतरली अन् ते क्षेत्र आहे राजकारणाचं.. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कंगना राणौत भाजपची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला उमेदवारी मिळाली आहे.

मोठी बातमी ! तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन, कंगणा राणौत हिची मोठी घोषणा; कारण काय?
| Updated on: May 06, 2024 | 1:08 PM
Share

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या निर्भिड वक्तव्यांसाठी, स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी कंगान आता एका नव्या क्षेत्रात उतरली अन् ते क्षेत्र आहे राजकारणाचं.. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कंगना राणौत भाजपची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला उमेदवारी मिळाली आहे. मंडीची लेक असलेली कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिला वाटतोय. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने चित्रपट, लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी मत मांडले. त्याचवेळी कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली. काय म्हणाली कंगना ?

राजकारणासाठी बॉलिवूडला राम-राम करणार कंगना ?

ही लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी हळूहळू शोबिझचे जग सोडू शकते, असे संकेत कंगनाने दिले. मला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आवडेल, असे तिने स्पष्ट केले. चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल ? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. ‘मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन. खरंतर , मला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल, असे कंगनाने स्पष्टं केलं.

लोकांना माझी गरज आहे, असं मला वाटलं तर मी त्याच दिशेने पाऊल टाकेन. ( या निवडणुकी) जर मी मंडीतून विजयी झाले तर मग मी राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्माते मला सांगतात, की राजकारणात जाऊ नकोस. पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही. मी एक प्रिव्हिलेज्ड आयुष्य जगलं आहे. आता जर मला लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी जोडलं जाण्याची संधी मिळत असेल तर मी तीदेखील स्वीकारेन.

राजकारण आणि फिल्मी दुनियेत किती फरक ? 

राजकारणातील जीवन हे चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे सर्व सुखावणारे आहे का ? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, चित्रपटांचं जग खोटं असतं. त्यासाठी वेगळे वातावरण तयार केलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार केला जातो. पण राजकारण हे वास्तव असतं. मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, लोकसेवेच्या या माध्यमात मी तशी नवीन आहे, मला शिकण्यासारखं खूप काही आहे, असं कंगनाने स्पष्ट केलं.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आत्तापर्यंत गँगस्टर, क्वीन, थलाइवी, तनु वेड्स मनु, फॅशन, मणिकर्णिका, यासारख्या अनेक दमदार चित्रपटात झळकली. इमर्जन्सी हा तिचा आगामी चित्रपट असून त्यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.