AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील ग्रोव्हरनंतर एक-एक कलाकाराने सोडली कपिल शर्माची साथ; कॉमेडियनने मांडली खदखद

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली.

सुनील ग्रोव्हरनंतर एक-एक कलाकाराने सोडली कपिल शर्माची साथ; कॉमेडियनने मांडली खदखद
Kapil sharma
| Updated on: Mar 19, 2023 | 9:21 AM
Share

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. 17 मार्च रोजी त्याचा ‘ज्विगाटो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कपिलने बऱ्याच मुलाखती दिल्या आहेत. अशाच एका मुलाखतीत तो ‘द कपिल शर्मा शो’मधील सहकलाकारांसोबत असलेल्या नात्याबाबत मोकळेपणे व्यक्त झाला. कपिलने याआधी एका मुलाखतीत कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या भांडणाबद्दल आपली चूक मान्य केली. रागाच्या भरात सर्वकाही झाल्याचं तो म्हणाला. सुनीलशिवाय त्याच्या शोमध्ये चंदन प्रभाकर, अली असगर, कृष्णा अभिषेक, उपासना सिंग हे कलाकारसुद्धा काम करायचे. मात्र एकानंतर एक अशा या कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम केला.

सहकलाकारांच्या एक्झिटवर काय म्हणाला कपिल?

कपिल शर्माच्या शोमध्ये या कलाकारांची कमतरता आजही प्रेक्षकांना जाणवते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिलने या सहकलाकारांच्या एक्झिटवर प्रतिक्रिया दिली. “त्यांना जाऊन विचारा की ते का नाही थांबले? मी तर माझ्याच जागी आहे. माझं सुनीलसोबत भांडण झालं होतं. ते ठीक आहे. पण तुम्ही इन्स्टाग्राम पाहत असाल तर भारती सिंग आणि मी नेहमीच एकत्र असतो”, असं तो म्हणाला.

याविषयी तो पुढे म्हणाला, “भारतीचं तिचं प्रॉडक्शन सुरू केलं आहे. ती तिचं काम करतेय आणि त्यात ती व्यग्र आहे. ती त्यापैकी त्यांनी ज्यांनी भांडण झाल्यामुळे माझा शो सोडला. उपासना सिंगसुद्धा चित्रपटांमध्ये चांगलं काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं. कृष्णासुद्धा माझा खूप चांगला मित्र आबे. त्यामुळे सुनील ग्रोव्हरला सोडून तुम्ही सर्वांना एकाच कॅटेगरीमध्ये नाही टाकू शकत. माझ्या बाजूला येऊन कोणी उभा आहे, असं मला वाटत नाही. या गोष्टीचा मी कधीच ताण घेतला नाही.”

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने सोडला होता शो

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली. सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती. या घटनेनंतर कपिलने अनेकदा सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलखतीत कपिलने त्याची चूक मान्य केली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...