AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना झाली व्यक्त; म्हणाली “त्याच्याशिवाय..”

करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचं जवळपास 17 वर्षांपूर्वी ब्रेकअप झालं होतं. 'जब वी मेट' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. आता 17 वर्षांनंतर करीना पहिल्यांदाच शाहिदविषयी व्यक्त झाली.

ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना झाली व्यक्त; म्हणाली त्याच्याशिवाय..
Kareena Kapoor and Shahid KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2024 | 9:06 AM
Share

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचं नातं इंडस्ट्रीत बरीच वर्षे चर्चेत होतं. जेवढी चर्चा त्यांच्या नात्याची झाली, तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचीही झाली. 17 वर्षांपूर्वी या दोघांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नव्हे तर आता 17 वर्षांनंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांमधील क्रेझ कायम आहे. यामध्ये शाहिदने आदित्यची आणि करीनाने गीतची भूमिका साकारली होती. ब्रेकअपनंतर शाहिद आणि करीना यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं होतं. कार्यक्रमांमध्ये जरी योगायोगाने दोघं एकमेकांसमोर आले, तरीही त्यांनी कधीच संवाद साधला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शाहिद कपूरशिवाय गीतची भूमिका इतकी गाजू शकली नसली, असं तिने म्हटलंय.

‘ब्रुट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत करीनाला ‘जब वी मेट’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटाविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी तिला सर्वाधिक कोणती गोष्ट आवडली, असा सवाल करीनाला करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सर्वकाही.. मी तुम्हाला सांगते की मला सर्वकाही आवडलं. गीत ही सर्वार्थाने भारतीय अभिनेत्री आहे. त्या भूमिकेची प्रत्येक गोष्ट मला आवडली. प्रत्येकाला गीतसारखं आयुष्य हवं असतं, तिच्यासारखं वागायचं असतं. आजही जेव्हा मी हा चित्रपट पाहते, तेव्हा मला ते खूप खास वाटतं.”

“गीतची भूमिका आदित्यपेक्षा प्रचंड विरोधातली होती. मी याठिकाणी शाहिदचे नक्कीच आभार मानू इच्छिते. कारण त्याने या चित्रपटात अप्रतिम काम केलंय. आम्हा दोघांची ऊर्जा त्या भूमिकांसाठी पूरक ठरली. त्याच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता”, असं ती पुढे म्हणाली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट ऑक्टोबर 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 50.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचं तमिळ आणि तेलुगूमध्येही डबिंग करण्यात आलं होतं.

‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच शाहिद आणि करीनाच्या नात्यात फूट पडली होती. ब्रेकअपनंतर त्यांनी 2016 मध्ये ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या ब्रेकअपविषयी ‘जब वी मेट’चा दिग्दर्शक इम्तियाज अली एका मुलाखतीत म्हणाला होता, “माझ्या चित्रपटाचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात असताना त्या दोघांचा ब्रेकअप झाला. चित्रपटाचं बऱ्याच अंशी शूटिंग झालं होतं. त्यांच्या ब्रेकअपनंतर अवघ्या दोन दिवसांचं शूटिंग बाकी होतं. पण तरीही त्यांच्या ब्रेकअपचा कामावर अजिबात परिणाम झाला नव्हता. दोघंही खूप प्रोफेशनल आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही घडलं होतं, त्याचे कोणतेच पडसाद सेटवर उमटले नव्हते.”

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी