AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न करणं ही माझी सर्वांत मोठी चूक; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पश्चात्ताप व्यक्त

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी गोसाई नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नाबाबत तिने पश्चात्ताप व्यक्त केला आहे. शिवानीने आतापर्यंत दोन वेळा लग्न केलं असून दोन्ही वेळा तिला घटस्फोटाचा सामना करावा लागला.

लग्न करणं ही माझी सर्वांत मोठी चूक; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पश्चात्ताप व्यक्त
अभिनेत्री शिवानी गोसाईंImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2025 | 8:45 AM
Share

‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी गोसाईंने दोनदा लग्न केलं आणि दोन्ही वेळा तिचा घटस्फोट झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती लग्नाविषयी आणि लग्नात आलेल्या तिच्या वाईट अनुभवांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शिवानीचं पहिलं लग्न वयाच्या 17 व्या वर्षी झालं होतं. हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर तिने 2011 मध्ये दुसरं लग्न केलं. फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर दोघांनी दोन महिन्यांतच लग्न केलं होतं. लग्नाच्या अवघ्या काही आठवड्यांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानी म्हणाली, “लग्न करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला सर्वकाही चांगलं वाटलं होतं. तो सगळ्यांशी खूप चांगला वागत होता. त्याने माझ्यावरही विशेष प्रभाव पाडला होता. परंतु लग्नानंतर तो पूर्णपणे बदलला. त्याने आधी जे काही सांगितलं होतं, ते सर्व खोटं होतं. मी त्याला माझ्या पहिल्या लग्नाविषयी सर्वकाही सांगितलं होतं, परंतु त्याने माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या होत्या. माझ्या अवती-भवती जे घडत होतं, ते पाहून मी आजारी पडली होती.”

“माझ्यावर तो प्रमाणापेक्षा जास्त हक्क गाजवत होता. मी कोणालाच एकटी भेटू शकत नव्हती. त्याने माझ्या चारित्र्यावरही संशय घेतला होता. मला अपशब्द सुनावले. हे सर्व माझ्या सहनशक्ती पलीकडे गेलं होतं. दुसऱ्या लग्नाच्या महिन्याभरातच मी घर सोडलं होतं. सुदैवाने मला काम मिळत गेलं आणि या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यात मदत झाली. लग्नानंतर मला समजलं की त्याच्याकडे पैसेच नाहीत. त्याने ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, ते पैसे परत घेण्यासाठी दारासमोर उभे राहिले. त्याने माझे दागिने मागितले. काही दिवसांनंतर त्याने माझी कार विकली होती. त्याने माझं शारीरिक शोषणही केलं होतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “तो माझ्या फोनमधील सर्व मेसेज वाचायचा. वॉचमनलाही पैसे देऊन माझ्याबद्दल माहिती घेत होता. त्याने एकदा मला सर्वांसमोर मारलं होतं. मी एका दगाबाज आणि पत्नीवर हात उचलणाऱ्याशी लग्न केलं होतं. त्याने माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. आता मला सिंगलच राहायचं आहे. मला फक्त माझ्या कामावर आणि कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. लग्नाच्या बाबतीत मी कमनशिबी आहे. लग्नानंतर मला खूप वाईट अनुभव आला. मी लग्नाच्या विरोधात नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण मला माझ्या लग्नाचा खूप पश्चात्ताप आहे. आतासुद्धा माझ्याविरोधात क्रिमिनल केस सुरू आहे, ज्याबद्दल मी फार काही सांगू शकत नाही. माझ्यासाठी ते सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं.”

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...