AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी शाळांचं वास्तव दाखवणारं ‘क्रांतीज्योती विद्यालय’; कसा आहे हेमंत ढोमेचा चित्रपट?

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये उत्तम कलाकारांची तगडी फौज असून हा चित्रपट एकंदरीत कसा आहे, ते जाणून घ्या..

मराठी शाळांचं वास्तव दाखवणारं 'क्रांतीज्योती विद्यालय'; कसा आहे हेमंत ढोमेचा चित्रपट?
krantijyoti vidyalay marathi madhyam review Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 04, 2026 | 10:55 AM
Share

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, विशेष म्हणजे या सर्व गोष्टींसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या प्रत्येकाकडून प्रयत्न व्हायला हवेत, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘फर्स्टक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. विशेष म्हणजे ‘क्रांतीज्योती विद्यालय’ पाहताना केवळ मराठी भाषा आणि मराठी शाळा या विषयांपुरताच चित्रपट मर्यादित असल्याचं वाटत नाही. अलिबागमध्ये या चित्रपटाची कथा घडते, त्यामुळे तिथलं देखणं निसर्गही यात पहायला मिळतो.

चित्रपटाची कथा

अलिबागमधील नागावच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय’ या मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) हे त्यांची शाळा लवकरच बंद होणार म्हणून प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांच्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या जागी एक चकचकीत इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाची शाळा बांधायचा निर्णय घेण्यात आला आहे. पडक्या शाळेच्या जागी मोठी, आधुनिक सोयीसुविधा असलेली दुसरी शाळा उभी राहणार आहे, मग त्यात अडचण काय आहे, असा शाळेच्या नावाखाली कोट्यवधी कमावण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचा सवाल आहे. तर अलिबागसारख्या गावात मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देणारी मोठी शाळा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असं पालकांचं म्हणणं आहे. तेव्हा आपला मूळ मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिर्के सर याच मराठी शाळेतून शिकून सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या निमित्ताने एकत्र आणतात.

या चित्रपटात हेमंतने पात्रांवर अधिक भर दिला आहे. या पात्रांच्या आधारे शिक्षणाकडे आणि मातृभाषेकडे पाहण्याचे विविध दृष्टीकोन त्याने कथेत मांडले आहेत. मराठी भाषा, मराठ भाषा यासंबंधीची सद्यस्थिती, प्रश्न, वास्तव या चित्रपटातून समोर येतात. या चित्रपटाचा विषय जरी सामाजिक असला तरी तो उपदेशपर वाटू नये, यासाठी हेमंतने पूर्ण प्रयत्न केले आहेत. उत्तम कलाकार आणि त्यांचं दमदार अभिनय ही या चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू ठरते. सचिन खेडेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, चिन्मयी सुमित, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारल्या आहेत. चित्रपटाचा मूळ विषय अत्यंत चोख मांडण्यात आला आहे. हेमंत ढोमेनं रंजक पद्धतीने विषयाचं गांभीर्य जाणवून दिलं आहे. हा चित्रपट पाहताना प्रत्येक प्रेक्षकाला त्याची मराठी शाळा आठवल्याशिवाय राहणार नाही.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत